💥राज्यातील गोरगरीबांसाठी उध्दव ठाकरे सरकारने सुरू केलेल्या 'शिवभोजन थाळीवर' येणार संक्रात ?


💥राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण शिवभोजन थाळी सुरू ठेवायची की नाही या संदर्भात घेत आहेत आढावा💥

मुंबई (दि.२६ सप्टेंबर) : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील सर्वसामान्य गोरगरीब रोजमजूरांना दोन वेळ पोटभर जेवन मिळावे यासाठी राज्यात सुरू केलेली 'शिवभोजन थाळी' या महत्त्वाकांक्षी योजनेला आता ब्रेक लागण्याची चिन्ह दिसू लागली असून राज्यात 'शिवभोजन थाळी' योजना सुरू ठेवायची की नाही याचा आढावा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण घेणार आहे.


राज्यातील तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पुर्व महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर या सरकारने राज्यातील गोरगरीब गरजवंतांसाठी १० रुपयांमध्ये शिवभोजन थाळी सुरू केली होती मात्र आता शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर मविआच्या प्रत्येक जनहीतवादी योजनांना स्थगिती दिली जात आहे. आता शिवभोजन थाळीबद्दल निर्णय घेतला जाणार असल्याची शक्यता आहे.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण या आठवड्यात अन्न व नागरी पुरवठा खात्या अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या योजनांचा आढावा घेणार आहे. शिवभोजन थाळी योजना मविआ सरकारच्या काळात सुरू करण्यात आली होती मात्र ही योजना नक्की कोणाच्या फायद्याची आहे याचा आढावा घेतला जाणार आहे. शिवभोजन थाळीची खरोखर गरज आहे का, हे पाहून कॅबिनेट समोर ठेवलं जाणार आहे.  सध्या राज्यात १ लाख ८० हजार शिवभोजन थाळ्यांसाठी परवानगी आहे. 

त्यातील १ लाख ४० हजार थाळ्या दिवसाला खाल्या जातात. मागील सरकारने २ लाख प्लेट करण्यात याव्या असं प्रस्ताव होता. पण, आता शिवभोजन थाळी किती लोकांपर्यंत पोहोचते आणि त्याचा खर्च किती होत आहे, याचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या