💥स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्सवासारखा साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे नियोजन...!


💥जिल्हाभर भरघोस कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे💥

परभणी (दि.4 आगस्ट) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येत असून महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून शासन निर्णयान्वये स्वराज्य महोत्सव हा उपक्रम देखील राबविण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत. परभणी जिल्ह्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव हा उत्सवासारखा साजरा व्हावा म्हणून जिल्हाभर पुढीलप्रमाणे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

       यामध्ये शुक्रवार दि.5 ऑगस्ट 2022 रोजी तरुण, युवक-युवती, विद्यार्थ्यांसाठी परभणी शहरात सायक्लोथॉन, मॅरेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तर शनिवार दि.6 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, भारताचा स्वातंत्र्य लढा, भारत एक महासत्ता , हर घर तिरंगा या विषयावर तालुकास्तरीय चित्रकला व रांगोळी स्पर्धांचे तालुकापातळीवर आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि.7 ऑगस्ट रोजी तालुकापातळीवर देशभक्तीपर गित गायन व सामुहीक नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि.8 ऑगस्ट रोजी ग्रामस्तरावर विशेष ग्रामसभा घेवून महापुरुष अवतरले ग्रामसभेला या विषयावर घेण्यात येणार असून शालेय विद्यार्थ्यांना भारतीय स्वातंत्र लढ्यातील महापुरुषांच्या वेशभुषेत ग्रामसभेमध्ये विचार मांडता येतील. मंगळवार दि.9 ऑगस्ट रोजी तिरंगा मानव साखळी तसेच सामुहिक राष्ट्रगान यात जिल्हास्तरावर क्रिडा संकुलात ऑगस्ट क्रांती दिनाबाबत कलात्मक सादरीकरण आणि सामुहीक राष्ट्रगानचे आयोजन तर तालुकास्तरावर भारताच्या आ कारात तीन रंगात विद्यार्थ्यांना उभे करुन सकाळी 11 वाजता सामुहिक राष्ट्रगान आयोजित करुन हा प्रसंग ड्रोन कॅमेऱ्याने छायाचित्रात कैद करण्यात येणार आहे. बुधवार दि.10 ऑगस्ट रोजी महापुरुषांच्या स्वप्नातील भारत या विषयावर तालुकास्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि.11 ऑगस्ट रोजी तालुकास्तरावरील महिला बचतगटांसाठी मुख्य ठिकाणी विविध स्पर्धा व प्रधार्षानीच्या आयोजन करणे यामध्ये तिरंगा रंगामध्ये खाद्यपदार्थाचे प्रदर्शन, महिलांचे रांगोळी, मेहंदी स्पर्धा इत्यादीच्या प्रदर्शनाच्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी हे भेट देवून विविध स्पर्धांचे विजेते घोषित करणार आहेत.  दि.12 ऑगस्ट रोजी तालुकास्तरावरील पहिल्या दोन विजेत्यांची जिल्हास्तरीय गायन व सांस्कृतिक स्पर्धा तसेच निवडक रांगोळीचे प्रदर्शन परभणी येथील अक्षदा मंगल कार्यालयात दुपारी 4 वाजता  घेण्यात येणार आहे. शनिवार दि.13 जुलै 2022 रोजी सकाळी 7 वाजता सर्व शालेय विद्यार्थ्यांची एकाच वेळी हर घर तिरंगा व देशभक्तीच्या घोषणा देत प्रभातफेरी काढण्यात येणार आहे. आणि रविवार दि.14 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय सर्व कार्यालयात, शाळा, महाविद्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी यांच्या सहभागातून स्वच्छता व प्लास्टीक कचरा संकलन करणे याप्रमाणे स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी परभणी यांनी कळविले आहे.....


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या