💥जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या चौकशी आदेशा नंतरही चौकशी अहवाल गुलदस्त्यात💥
पुर्णा शहराला जोडणारा झिरो टी पॉईंट ते नरहरी महाराज चौक हा मुख्य हॉटमिक्स (डांबररोड) रस्ता नगर परिषद प्रशासनाकडून कोट्ट्यावधी रुपयांच्या निधीतून अवघ्या तिन महिण्यापुर्वी आक्टोंबर महिण्यात तयार करण्यात आला होता यावेळी संबंधित रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट व दर्जाहीन होत असल्याच्या अनेक तक्रारी जागृक नागरिकांकडून करण्यात आल्या होत्या परंतु राजकीय क्षेत्रासह प्रशासनातील भ्रष्ट बेईमानांच्या मजबूत साखळी समोर सर्वच तक्रारींसह जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या तक्रारीला ही केराची टोपली दाखवत पहाता पहाता बोगस रस्त्याचे काम पुर्ण करून कोट्ट्यावधी रुपयांच्या शासकीय विकासनिधीची सोईस्कररित्या विल्हेवाट लावण्यात आली ज्याचा परिणाम अवघ्या तिनच महिण्यात शहरातील नागरिकांना पाहावयास मिळाला असून उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच या रस्त्यावरील बोगस डांबर वितळण्यास सुरूवात झाली असून या डांबराचे अक्षरशः चिखल झाल्याचे दिसत असून यामुळे परिसरातील व्यापारी व नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे रस्त्याच्या डांबरीकरणासाठी वापरण्यात आलेले हे डांबरच आहे की वंगन असा प्रश्न नागरीकांमध्ये उपस्थित होत असून कोट्ट्यावधी रुपयांच्या विकासनिधीतून बनवण्यात आलेल्या सदरील रस्त्याचे बोगसकाम नगर परिषद प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराची उघड साक्ष देत आहे.....
0 टिप्पण्या