🌟वंसतराव नाईक मराठावाडा कृषी विद्यापीठ शेतकऱ्याच्या सेवेत सदैव तत्पर - डॉ.उदय खोडके


🌟मौजे पिंप्री देशमुख येथे आयोजित पीक मार्गदर्शन व चर्चासत्राच्या कार्यक्रमा प्रसंगी बोलतांना ते म्हणाले🌟 


परभणी : परभणी जिल्हा तालुक्यातील मौजे पिंप्री देशमुख येथे बुधवार दि.१० जुलै रोजी उद्यानविद्या महाविद्यालय व वंसतराव नाईक मराठावाडा कृषी विद्यापीठ परभणी यांचा वतीने ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम व कृषी औद्योगिक सलग्न अंतर्गत उद्यानकन्या कडून पीक मार्गदर्शन व चर्चासत्राचे अयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता (कृषी) डॉ. उदय खोडके हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते, कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय वसंतराव नाईक यांचे प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले, त्यानंतर सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना महाविद्यालयाचे प्राध्यापक व प्रभारी अधिकारी डॉ. व्ही. एस. खंदारे यांनी केली. प्रमुख उपस्थितीमध्ये गावचे सरपंच श्री. दिगंबर सावणे, उप सरपंच श्री. नागेश देशमुख, कृषी प्रवेक्षक श्री. रजनीकांत  देशमुख व कृषी सहाय्यक श्री. आणेराव व डॉ. गणपत कोटे उपस्थित होते तसेच कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून लाभलेले डॉ. पी. आर. देशमुख, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी, यांनी विद्यापीठातील विविध उपक्रमाचे व माहितीचा प्रसार शेतकऱ्यापर्यंत कश्या पध्द्तीने पोहचला जातो याचे सखोल मार्गदर्शन केले. डॉ. जी. डी. गडदे, विस्तार कृषी विद्यावेता तथा व्यवस्थापक यांनी खरीप पिकातील बीज प्रक्रिया,  तण व अन्नद्रव  व्यवस्थापन या विषयवर मार्गदर्शन केले. डॉ. जी. पी. जगताप, सहयोगी प्राध्यापक (पीक रोगशास्त्र) यांनी पिकावरील रोग नियंत्रण व बायोमिक्सचा विविध पिकासाठी वापर यावर मार्गदर्शन केले. डॉ. डी. डी. पटाईत, सहाय्यक प्राध्यापक (कृषी कीटकशास्त्र) यांनी खरीप पिकावरील किडीचे नियंत्रण कसे करावे यावर मार्गदर्शन केले व श्री. एम . बी. मांडगे यांनी कापूस पिक व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाच्या शेवटी प्रगतशील शेतकरी श्री. विठ्ठल पांचाळ यांनी अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आभार व्यक्त केले. तर अध्यक्षीय समारोपामध्ये डॉ. यु. एम. खोडके, संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता (कृषि), वनामकृवि, परभणी यांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम उपक्रमाबाबत व विद्यापीठाने शेतीमध्ये केलेले योगदानाची माहिती सर्व उपस्थिताना करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. स्वाती पुंड व कु. जया सावंत यांनी केले. तर कार्यक्रमाचे आयोजन डॉ. बी. एम. कलालबंडी, कार्यक्रम समन्वयक, डॉ. सचिन पव्हणे व कु. ज्योती कळंबे कार्यक्रम अधिकारी यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वीते करीता उद्यानकन्या कु. कीर्ती खेंदाड, गायत्री कुशराम, चैताली पाकधने, कोमल पौळ, धनश्री रासवे व स्नेहल शिंगाडे व समस्त गावकरी पिंप्री देशमुख यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे शेवटी वृक्षदिंडी काढून अध्यक्षाच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या