🌟राष्ट्र निर्माण करण्याच्या कार्यात शिक्षकांचे मोठे योगदान - डॉ.गोविंद कामटे

                                  


🌟प्रसिद्ध समाजसेवक गोविंद पौढे गुरुजी यांच्या सेवानिवृत्त कार्यक्रमाच्या वेळेसबोलतांना ते म्हणाले🌟 


परभणी (प्रतिनिधी) :-  परभणी येथील प्रसिद्ध समाजसेवक गोविंद पौढे गुरुजी यांच्या सेवानिवृत्त कार्यक्रमाच्या वेळेस डॉ.गोविंद कामटे यांनी मार्गदर्शनपर भाषणात असे संबोधले की राष्ट्र निर्माण करण्याच्या भागीदारी शिक्षकांचा खूप खारीचा वाटा असतो कारण बालपणी विद्यार्थ्यांना मिळालेले संस्कार हे भविष्य घडवितात कुंभार जसा मडक्याला आकार देतो तसा विद्यार्थी घडविण्याचा आणि त्या देशातील सुज्ञ नागरिक घडविण्याचे काम हे शिक्षक करीत असतात असे मार्गदर्शनपर प्रतिपादन डॉ.गोविंद कामटे यांनी केले.


आज राष्ट्रजन फाउंडेशन परभणी यांच्यावतीने साडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक पौढे गुरुजी यांची चाळीस वर्षे शिक्षक पदावर नोकरी करून हजारो IAS, IPS,डॉक्टर,वकील,इंजिनियर, संपादक,पत्रकार, समाजसेवक,प्रगतिशील शेतकरी अशा वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांने हजारो विद्यार्थी घडवून आज त्यांच्या कार्याला शिक्षक पदातून सेवानिवृत्त झाले आहेत. ह.भ.प  गोविंद महाराज पौढे गुरुजी  यांनी साडेगाव जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत नोकरी करून आज 30 जून रोजी सेवानिवृत्ती झाली आणि त्यांच्या जिल्हा रुग्णालय परभणी येथे रामकृष्ण हरी अन्नदान छात्रालय मागील चार वर्षापासून सातत्याने रोज नित्य नियमाने सकाळी 8 वाजता दररोज खिचडी वाटप केली  जाते म्हणून परभणी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध खिचडीवाले गुरुजी म्हणून त्यांचं नाव प्रसिद्ध झाले  अनेक सामाजिक सर्व क्षेत्रात हजारो कीर्तन मोफत कीर्तन समाज प्रबोधन करणारे अशा अनेक उपक्रमातून देशाची सेवा व महाराष्ट्राची सेवा परभणीची सेवा रुग्णांची सेवा विद्यार्थ्यांची सेवा करणारे ह.भ.प महाराज पौढे गुरुजी  यांच्या सेवानिवृत्तीच्याबद्दल गोविंद महाराज पौढे गुरुजी व सुवर्णाताई गोविंद पौढे  या दोघांचा पती-पत्नीच्या गौरव सन्मानपत्र शाल श्रीफळ हार  पुष्पगुच्छ देऊन सत्कार स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र वीरशैव सभेचे जिल्हाध्यक्ष शिवलिंगआप्पा खापरे कार्यक्रमाचे उद्घाटक ह.भ.प हनुमान महाराज रणेर गुरुजी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी वीरशैव विचार मंचचे  अध्यक्ष पंचाचार्यरत्न महेश स्वामी प्रमुख पाहुणे भारत पतंजली योग स्वाभिमानी समिती परभणी चे संपर्कप्रमुख चंपालाल देवतवाल ठाकूर स्वागतप्रमुख राष्ट्रजन फाउंडेशन महाराष्ट्राचे सल्लागार आयुर्वेदिक डॉ.गोविंद कामटे सेलूकर कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रजन फाउंडेशन संस्थापक व अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर  यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित भाषण करताना एक सुंदर अशी कविता म्हणून सांगितली ती पुढील प्रमाणे :-

   गो - गोष्ट एका सामाजिक भान अन जाण 

       असणाऱ्या माणसाची 

विं-विनम्रता सदैव अंगी भरलेल्या

       माणुसकीच्या कणसाची 

द - दर्पण समाजसेवेचे हाती घेऊन 

      निघालेल्या प्रवासाची

पों-पोशिंदा होऊन उपाशी पोटी 

       आपुलकीने भरवलेल्या घासाची

ढे-ढेबर न भरले कुणालाही ना लुबाडून,

     हात सदैव मदतीचा, ओढ नेहमीच 

     मानवतेच्या ध्यासाची....

                  कविताच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले कार्यक्रमाच्या  आभार प्रदर्शन बालकलाकार रुद्राक्ष आवटे यशस्वी साठी माऊली मित्र परिवार दिनांक 3 जुलै 2024 रोजी रात्री 8 वाजता रामकृष्ण हरी अन्नदान छत्रालय कार्यालय शिवराम नगर, वसमत रोड परभणी अशी माहिती संयोजक वीर वारकरी सेवासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष वारकरी सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे पत्रकारांना माहिती दिली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या