🌟परभणी जिल्ह्यात पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत धनगर समाजातील विद्यार्थ्यांकडून 30 जुलैपर्यंत अर्ज आमंत्रित...!


🌟असे आवाहन सहायक आयुक्त गीता गुठ्ठे यांनी केले आहे🌟

परभणी (दि.02 जुलै 2024) : इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या 6 सप्टेंबर 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार आदिवासीच्या धर्तीवर धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी ‘पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना’ सुरु करण्यात आली आहे. या योजनेसाठी धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकडून 2024-25 या वर्षासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी धनगर समाजातील विद्यार्थी शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळण्यासाठी पात्र असूनही प्रवेश मिळालेला नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी  महानगरपालिका, विभागीय शहरे आणि जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेनुसार या समाजातील इयत्ता 12 वी नंतरच्या तंत्र शिक्षण तसेच व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रमाच्या शासकीय व अनुदानित महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश केले आहेत. परंतु शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश न मिळाल्यामुळे अश विद्यार्थ्यांना या योजनेंअतर्गत भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन घेण्यासाठी त्याच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट रक्कम वितरण करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. ही योजना धनगर समाजातील विद्यार्थ्यांना लागू राहील.

 * योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व निकष :-

विद्यार्थी धनगर समाजाचा असावा. त्याने अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. त्याच्या पालकाचे उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था तो राहत असलेल्या शहरातील नसावी किंवा तो विद्यार्थी तेथील रहिवाशी नसावा. विद्यार्थी इयत्ता 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा.  इयत्ता 12 वीमध्ये त्याला 60 टक्के गुण मिळालेले असावेत. तो विद्यार्थी या योजनेस पात्र राहील. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमाचा कालावधी 2 वर्षापेक्षा कमी नसावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांने इयत्ता 12 नंतरच्या मान्यता प्राप्त तंत्रशिक्षण तसेच व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती किमान 60 टक्के असणे आवश्यक आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कमाल वय 28 वर्षापेक्षा जास्त नसावे. धनगर समाजातील अपंग विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ प्राधान्य देय राहील. विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करणारा नसावा. विद्यार्थी व शैक्षणिक संस्थेने योजनेचा लाभ घेताना शासनाची फसवणूक केल्याचे आढळल्यास विद्यार्थी व शैक्षणिक संस्था कायदेशीर कारवाईस पात्र राहील. तसेच योजनेअंतर्गत दिलेल्या रक्कमेची 18 टक्के दंडनीय व्याजासह वसुली करण्यात येईल. तरी या योजनेंअंतर्गत जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांनी आवेदन पत्र सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, परभणी या कार्यालयाकडे दिनांक 30 जुलैपर्यंत सादर करण्याचे आवाहन सहायक आयुक्त गीता गुठ्ठे यांनी केले आहे.....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या