🌟शंकानिरसनासाठी निशुल्क क्रमांकावर संपर्क साधण्याचे शेतकऱ्यांना आवाहन.....!


🌟शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी 1800 233 4000 आणि 9822446655 हा क्रमांक उपलब्ध🌟

परभणी (दि. 25 जुन 2024) : राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या शेतीशी निगडित शंका व प्रश्नांचे समर्पक निरसन व मार्गदर्शन करण्यासाठी कार्यालयीन कामाच्या दिवशी कक्ष सुरू केला आहे. या कक्षामध्ये शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी 1800 233 4000 आणि 9822446655 हा क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. 

शेतकऱ्यांनी त्यांना असलेल्या शंकाचे निरसन करण्यासाठी कृषी विभागाशी किंवा वरील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  शेतकऱ्यांसाठी हा निशुल्क क्रमांक वर्षभर सुरू राहणार असून, त्यांना खते, बियाणे, कीटकनाशके यांची खरीप रब्बी हंगामातील किंमत, उपलब्धता, गुणवत्तेबाबत शंका निरसन करून घेता येणार आहे. 

कृषी विभागाशी निगडित मृदा संधारण, विस्तार, सांख्यिकी प्रक्रिया व नियोजन, फलोत्पादन, निविष्ठा व गुणनियंत्रण, कृषी यंत्रीकिकरण  इत्यादी संबंधित शंकांचे निरसन करता येईल. संबंधित जिल्ह्यातील कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठांचे संपर्क क्रमांक आवश्यकता असल्यास दिले जातात.

तसेच 9822446655 हा निशुल्क क्रमांक केवळ संदेश पाठवण्यासाठी वापरता येणार असून, तो कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहील. खरीप हंगाम व रब्बी हंगामात कृषी निविष्ठाची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी  व लिंकिंगबाबतच्या तक्रारी नोंदवताना शेतकऱ्यांनी आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, अडचणी किंवा तक्रारीचा संक्षिप्त तपशील व्हाट्सअप वर पाठवणेसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी या निशुल्क क्रमांकावर संपर्क साधून आपल्या शंकांचे निरसन करून घेण्याचे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आले आहे...... 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या