🌟आदिवासीच्या धर्तीवर धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत अर्ज आमंत्रित....!


🌟इतर मागास बहुजन कल्याण परभणी या कार्यालयाकडे दि.30 जून पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन🌟

परभणी (दि.21 जुन 2024) : आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीसाठी सुरु असलेल्या प्रस्तावास अनुलक्षुन आदिवासीच्या धर्तीवर धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी "पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना सुरु करण्यात आली आहे.

सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी धनगर समाजातील जे विद्यार्थी शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळण्यासाठी पात्र असुनही ज्यांना शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळालेला नाही. अशा विद्यार्थ्यांकरीता महानगरपालिका, विभागीय शहरे आणि जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थामध्ये शिक्षण घेत असलेल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासुन इयत्ता 12 वी नंतरच्या प्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रमाच्या शासकीय व अनुदानित महाविद्यालयामध्ये केंद्रीभुत प्रवेश प्रक्रियाद्वारे प्रवेश केलेल्या परंतु शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना "पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना या योजनें अतर्गत भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरण करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.सदर योजना महानगरपालिका, विभागीय शहरे आणि जिल्हास्तरीय सर्व शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेतलेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना मान्यता प्राप्त तंत्र शिक्षण तेच व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रमाच्या शासकीय तसेच अनुदानित महाविद्यालयामध्ये केंद्रीभुत प्रवेश प्रक्रीयेद्वारे प्रवेश घेऊन शिक्षण घेणा-या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना लागु राहील.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी  पुढीलप्रमाणे अटी व निकष लागू राहतील. विद्यार्थी धनगर समाजाचा असावा, विद्यार्थ्यांनी अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न रुपये 2 लाख 50 हजारपेक्षा जास्त नसावे.  विद्यार्थ्यांचे प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवाशी नसावा.  विद्यार्थी इयत्ता 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा. इयत्ता 12 वी मध्ये 60 टक्के गुण मिळालेले विद्यार्थी या योजनेस पात्र राहतील.  विद्यार्थ्यांचे प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमाचा कालावधी 2 वर्षापेक्षा कमी नसावा. सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी संबंधीत विद्यार्थ्यांनी इयत्ता 12 नंतरच्या मान्यता प्राप्त तंत्रशिक्षण तसेच व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्याल्यामध्ये केंद्रीभुत प्रवेश प्रक्रियाद्वारे प्रवेश घेतलेला असावा.  विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती किमान 60 टक्के असणे आवश्यक आहे.  या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कमाल वय 28 वर्षापेक्षा जास्त नसावे. धनगर समाजातील अपंग विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभ प्राधान्य देय राहील. विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नौकरी किंवा व्यवसाय करणार नसावा.  विद्यार्थी व शैक्षणिक संस्थानी सदर योजनेचा लाभ घेताना शासनाची फसवणुक केल्याचे आढळल्यास विद्यार्थी व शैक्षणिक संस्था कायदेशीर कारवाईस पात्र राहील. तसेच योजनेअंतर्गत दिलेल्या रक्कमेची 18 टक्के दंडनीय व्याजासह वसुल करण्यात येईल.

तरी या योजनेंअंतर्गत जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांनी आवेदन पत्र सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, परभणी या कार्यालयाकडे दि. 30 जून 2024  पर्यंत सादर करण्याचे आवाहन सहायक संचालक श्रीमती गीता गुठ्ठे यांनी केले आहे......

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या