🌟पुर्णा शहरासह तालुक्यात बी-बियाणे खतांची चढ्या दराने विक्री....!


🌟बी-बियाणे खतांची चढ्या दराने विक्री करुन शेतकऱ्यांचे आर्थिक सोशन करणाऱ्यांवर कारवाई करा - अ.भा.ग्राहक पंचायत


पुर्णा (दि.१० जुन २०२४) - पुर्णा शहरासह तालुक्यात कृषी केंद्र चालक बी बियाणे खत विक्री चढ्या दराने विक्री करत असल्याने कृषी केंद्र चालकांवर सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या वतीने आज दिनांक 10 जून रोजी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे एका निवेदनात केली आहे पूर्णा तालुक्यात शेतकरी वर्ग खरीप पेरणीसाठी कृषी केंद्रावर खते बी- बियाणे मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत कृषी केंद्र चालकाकडून बी बियाणे खते चढ्या दराने विक्री करत असून कृत्रिम तुटवडा दाखवून  सध्या बी बियाणे उपलब्ध नसून असे सांगून कृषी केंद्र चालक चढ्या दराने बी बियाणे खते विक्री करत आहेत शेतकऱ्यांना जीएसटी बिले न देता साध्या कागदावर बिली देत आहेत यात शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान होऊन त्यांची फसवणूक होत आहे याकडे पूर्णा तालुका कृषी विभागने बी बियाणे खते  कीटकनाशकाची चढा दराने होत असलेल्या कृषी केंद्रावर कठोर कारवाई करावी व तसेच तालुक्यातील सर्व कृषी केंद्रावर बी बियाणे खते उपलब्ध साठा यांचे नाम फलक बोर्ड लावण्यात यावे तसेच कृषी केंद्र चालकाची तपासणी व गुणवत्ता निरीक्षक कथा मार्फत सोयाबीन कापूस उडीद तुर मूग इत्यादी बीयाण्यांसह पिकांसाठी लागणारे सर्व रासायनिक खताचे नमुने घेऊन तपासणी करावी चढ्या दराने बी बियाणे खते विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई कारवाई करून त्यांचे कृषी केंद्राचे परवाने रद्द करण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा पूर्णेच्या वतीने करण्यात आली आहे त्यावेळी तालुका अध्यक्ष जनार्दन आवरगंड शहराध्यक्ष सय्यद सलीम एम सुहागनकर शहर संघटक सुशिल गायकवाड. सचिव नारायण सोनटक्के.शहर उपाध्यक्ष किशोर सूर्यवंशी. महिला शहराध्यक्ष मथुरा गरड. भारती खंदारे सदस्य. सह ग्राहक पंचायत चे पदाधिकारी उपस्थित होते.

🌟बि-बियाणांची साठेबाजी करून कृत्रिम टंचाई : शेतकऱ्यांना जास्तीच्या भावाने विक्री थांबवा - अतिशनाना गरड

पाऊस पडल्यामुळे शेतकरी बियाणे खरेदी करण्यासाठी बाजारात फिरत आहे अनेक व्यापारी बाजार पेठेत बियाणे उपलब्ध असताना शेतकऱ्यांना बियाणे संपले म्हणून वापस पाठवतात अनेक व्यापारी बियाणांची साठेबाजी करून बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण करत आहेत नंतर तेच बियाणे जास्तीच्या भावाने विक्री केली जाते साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या व्यापाऱ्याची गोडवणे तपासा अन्यथा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्रजी पवार  हि शेतकऱ्यांना गोडवून मध्ये बियाणे वाटप करेन याची दक्षता कृषी अधिकारी व विभागाने घ्यावी बाजारात होणारी बियाणांची होणारी साठेबाजी थांबून शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देण्यात यावी तसेच अनेक व्यापारी बाजारात तुलसी कंपनीची कब्बडी, ऍग्रो सिड्स कंपनीचे 7067 , राशी 578,659 अशा बियाणांची विक्री 864 रू किंमतीची बॅग हि बाराशे, तेराशे रुपये किमतीने कळ्या बाजारात विक्री केली जात आहे कळ्या बाजारात होणारी विक्री तत्काळ थांबवा ही विनंती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या