🌟परभणी जिल्ह्यातील संबंधित शेतकऱ्यांनी फळ पीक विमा योजनेत संबंधित सहभागी व्हावे...!


🌟मृग व आंबिया बहारातील फळांचा विमा भरण्यास सुरुवात🌟

परभणी (दि.18 जुन 2024) : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सन 2024-25 या वर्षात राबवण्यासंदर्भात राज्य शासनाने मान्यता दिली असून मृग बहार व आंबिया बहारातील ठराविक फळ पिकांचा विमा शेतकऱ्यांनी भरून या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल गवळी यांनी केले आहे.

या हंगामात जिल्ह्यात डाळिंब, संत्रा, मोसंबी, चिकू, पेरू, लिंबू, सीताफळ इत्यादी पिकांचा फळपीक विमा योजनेत सहभाग करण्यात आला आहे. ही योजना जिल्ह्यात युनिव्हर्सल सोम्पो या कंपन्यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे.मृग बहरात संत्रा, पेरू, लिंबू या तीन पिकांसाठी विमा भरण्याची अंतिम मुदत 25 जून निश्चित करण्यात आली आहे; त्याचबरोबर मोसंबी, चिकू 30 जून, डाळिंब 14 जुलै तर सीताफळ पिकासाठी 31 जुलै ही मुदत देण्यात आली आहे. दरम्यान 2024 ते 26 या दोन वर्षात राबविण्यात येणाऱ्या फळपिक विमा योजनेचे स्वरूप, विमा संरक्षित रक्कम यांसह सविस्तर माहिती कृषी विभागाकडून जारी करण्यात आली आहे. 

प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत पुर्नरचीत हवामानावर आधारित फळपिक विमा योजनेत मृग बहारासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, संबंधित तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल गवळी यांनी केले आहे.......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या