🌟संत बाबा चैतन्य समाधी दिन : बाबाचैतन्यांची कौटुंबिक माहिती....!


🌟त्यांची समाधी ओतूर येथे असून त्यांचा समाधिकाल सन १५७१ साली २० मे असावा असे संशोधकाचे मत आहे🌟

केशव चैतन्याने अनेक अद्‌भुत चमत्कार केल्याच्या आख्यायिका आहेत. तुकाराम महाराजांचे गुरू बाबाजी चैतन्य आणि केशव चैतन्य हे एकच होत, असे काही विद्वान मानतात तथापि बाबाजी चैतन्य हा त्याचा शिष्य होता, असे काही विद्वानांनी निदर्शनास आणून दिले आहे. त्यांची समाधी ओतूर येथे असून त्यांचा समाधिकाल सन १५७१ साली २० मे असावा, असे संशोधकाचे मत आहे.

          गुरुपरंपरा- वेदव्यास, राघवचैतन्य, केशवचैतन्य अशी होती, असे कळते. तुकारामांना केशवचैतन्यांचे प्रत्यक्ष दर्शन घडले नाही, तर स्वप्नात त्यांना दृष्टांत झाला. याला प्रमाण म्हणून तुकारामांचा पुढील अभंग सांगितला जातो-

           सदगुरूराये कृपा केली मज। 

           परी नाही घडली सेवा काही ॥धृ॥

           सापडविले वाटे जाता गंगास्नाना। 

           मस्तकी तो जाणा ठेविला कर॥१॥

          भोजना मागती तूप पावशेर।

          पडला विसर स्वप्नामाजी॥२॥

          राघवचैतन्य केशवचैतन्य।   

          सांगितली खूण मालिकेची॥३॥

         बाबाजी आपुले सांगितले नाम। 

         मंत्र दिला रामकृष्णहरी ॥४॥

         माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार। 

        केला अंगीकार तुका म्हणे॥५॥"

        केशव चैतन्य- बाबाजी चैतन्य हे संत तुकारामांचे गुरू मानले जातात. त्याचे मूळ नाव विश्वनाथ. जन्म पुनवाडी किंवा पुणेवाडी- पुणे येथील आहे. पित्याचे नाव नृसिंह आईचे नाव आनंदी होते. उपनाम राजर्षी किंवा राजऋषी होते. गिरिजा नामक स्त्रीशी त्यांचा विवाह झाला होता. त्याशिवाय त्यांच्यावर मोहित झालेल्या झबुन्नीसा आणि रोशन या यवन स्त्रियांचाही त्यांनी भार्या म्हणून स्वीकार केला होता. पुढे आलेल्या एका आपत्तीत झबुन्निसा आणि रोशन यांना मरण आले व गिरिजेसह ते ओतुर जि.पुणे येथे आले. तेथे राघव चैतन्य या सत्पुरुषाची गाठ पडून विश्वानाथांनी त्यांचे शिष्यत्व पतकरले आणि संन्यास घेतला. केशव चैतन्य हे त्यांचे संन्यास धर्मातील नाव होय. त्यांची समाधी ओतूर येथेच आहे. कृष्णदास बैरागीकृत चैतन्यलीला या अप्रकाशित ग्रंथात केशव चैतन्याने पुढील पाच ग्रंथ लिहिल्याचे म्हटले आहे- भक्तिप्रकाश, वैकुंठपद, वासनामय देह, गीताभागवतसार आणि परमार्थविचार तथापि ते सर्व अनुपलब्ध आहेत. त्यांच्या नावावर असलेले एक पद आढळते. त्यात-   

       "नवविधा भक्ति निरंतर करवावी। 

       केशव चैतन्य शरण तुला रे।।" अशी ओळ आहे. तथापि तीत उल्लेखिलेला केशव चैतन्य हाच होय, असे मानण्यास पुरावा नाही. केशव चैतन्याने अनेक अद्‌भुत चमत्कार केल्याच्या आख्यायिका आहेत. तुकाराम महाराजांचे गुरू बाबाजी चैतन्य आणि केशव चैतन्य हे एकच होत, असे काही विद्वान मानतात. तथापि बाबाजी चैतन्य हा त्यांचा शिष्य होता, असे काही विद्वानांनी निदर्शनास आणून दिले आहे. त्यांची समाधी ओतूर येथे असून त्यांचा समाधिकाल सन १५७१ साली २० मे असावा, असेही सांगितले जाते. समाधी स्थानाच्या शेजारी मांडवी नदीचा प्रवाह वाहतो.


!! बाबा चैतन्य महाराजांना त्यांच्या समाधी दिनी कोटी कोटी विनम्र अभिवादन !!    

                   - संकलन व सुलेखन -

                   श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.

                   गडचिरोली, फक्त व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या