🌟राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून सामाजिक उत्तराई होण्याची प्रेरणा मिळते - प्रा.डॉ.विशाल पतंगे


🌟येथील स्वा.सै.सूर्यभानजी पवार महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वार्षिक शिबिराच्या उदघाटन प्रसंगी ते म्हणाले🌟

पुर्णा (दि.१२ फेब्रुवारी) - राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने सामाजिक उत्तराई होण्याची प्रेरणा मिळत असते असे प्रतिपादन प्रा.डॉ.विशाल पतंगे यांनी केले ते येथील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वार्षिक शिबिराच्या उदघाटन प्रसंगी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते या कार्यक्रमाचे उदघाटन पांगरा या गावचे सरपंच उत्तमरावजी ढोणे यांनी केले तर शिबिराचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.प्रभाकर सूर्यवंशी यांनी मांडले. 


पुढे बोलताना प्रा. डॉ. पतंगे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी चार  भिंतीच्या बाहेरच जग अनुभवलं पाहिजे,अभ्यासले पाहिजे. समाजातील या अनुभवाचे ज्ञानच विद्यार्थ्यांना जीवन जगण्यासाठी खऱ्या प्रेरणा देत असतात. त्यामुळे आजचे विद्यार्थी उद्याच्या समाजाचे खरे शिलेदार बनू शकतात. राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून श्रमाचा आणि साहसी जीवनाबद्दलचा दृष्टिकोन मिळतो, हाच दृष्टिकोन आपल्यावर सामाजिक संस्कार करत असतो म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचे खऱ्या अर्थाने सार्थक होते. असेही त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनात सांगितले. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार यांनी विद्यार्थ्यांना जीवनात पुढे जायचे असेल कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नसल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी परिश्रमाची सवय लावून घेतली पाहिजे. मनातील न्युनगंड माणसाला पराभूत करतो म्हणून वाचनातून व श्रमातून चांगले वाईट याची निवड करण्याची सवय लागली की आपोआप आत्मविश्वास वाढतो व न्यूनगंड गळून पडतो हे सर्व राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून साध्य करता येते असे त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. 

या कार्यक्रमासाठी गावातील माजी सरपंच तथा तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नामदेवराव ढोणे, शालेय समितीचे अध्यक्ष रमेश ढोणे, विठ्ठलराव ढोणे, सखारामजी ढोणे, निवृत्ती ढोणे, अर्जुन ढोणे, शिवाजी ढोणे, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, महाविद्यालयातील प्राध्यापक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. दिपमाला पाटोदे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. किर्तनकार यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या