🌟परभणी जिल्ह्यातील उत्पादित होणारा चारा,मुरघास,आणि टोटल मिक्स रेशन....!


🌟यांची इतर जिल्ह्यात वाहतुक करण्यास मनाई🌟

परभणी : सद्यःस्थितीत जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने कालावधीत जनावरासांठी चाऱ्याची टंचाई परीस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात मागील वर्षीच्या पेरणी अहवालानुसार दिनांक 1 एप्रिल, 2023 पासुन 3 लाख 65 हजार 174 मे. टन चारा शिल्लक असुन, तो अंदाजे एप्रिल 2024 पर्यंत पुरेल. ऐवढ्या चाऱ्याची उपलब्धता पाहता भविष्यात चाऱ्याची टंचाई भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जर जिल्ह्यात उत्पादन होणारा चारा, एकुण मिक्स रेशन (टीएमआर) वाहतुकीवर बंदी आणल्यास माहे एप्रिल, 2024 अखेर पर्यंत चारा टंचाई भासणार नाही. जिल्ह्यात उत्पादन होणारा चारा, मुरघास आणि एकुण मिक्स रेशन (टीएमआर) यांची इतर जिल्ह्यात वाहतुक करण्यास बंदी आणने, जिल्ह्याबाहेरील निविदा धारकांना लिलाव देण्यात येऊ नये जेणे करुन जिल्ह्यात चारा टंचाई भासणार नाही आणि त्यामुळे कायदा व सुव्यवस्थतेचा प्रश्न निर्माण होणार नाही.

याकरीता जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रघुनाथ गावडे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 नुसार त्यांना प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्ह्यातील उत्पादीत होणारा चारा, मुरघास, आणि एकूण मिक्स रेशन (टीएमआर) यांची इतर जिल्ह्यात वाहतुक करण्यास मनाई केली आहे. सदरचा आदेश निर्गमित करण्यात आल्याच्या दिनांकापासुन पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहे.....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या