🌟परभणी जिल्ह्यातील 29 स्वस्त धान्य दुकानदारांचे प्राधिकार पत्र निलंबित....!


🌟तर 93 दुकानदारांची 33 लाख 80 हजार 745 एवढी अनामत रक्कम जप्त🌟

परभणी (दि.28 फेब्रुवारी) : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना आणि शेतकरी योजनेवरील पात्र लाभार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी गणपती व दिवाळी सनानिमित्त आनंदाचा शिधाजिन्नस संच सन 2023 मध्ये वितरीत करण्यात आला होता. लाभार्थ्यांना शिधाजिन्नस संच वितरीत करण्यासाठी प्रति संच रू. 100 प्रमाणे वितरीत करून विक्रीपोटी प्राप्त होणारी रक्कम मार्जिन वजा जाता उर्वरीत रक्कम सात दिवसाचे आत रास्तभाव दुकानदार यांनी शासनास चालनद्वारे भरणा करावयाची होती. परंतु अनेक रास्तभाव दुकानदारांनी अद्यापपर्यंत शिधाजिन्नसची रक्कम शासनास जमा केलेली नाही. त्यामुळे जिल्हा पुरवठा कार्यालय, परभणी यांच्याकडून संबंधित रास्तभाव दुकानावर कारवाई करण्यात आली असून, त्यामध्ये पाथरी तालूक्यातील -02 तर जिंतूर-04, सेलू-01, गंगाखेड-22 असे एकूण 29 रास्त भाव दुकानदारांचे प्राधिकारपत्र पत्र निलंबित करण्यात आले आहे. तर 93 रास्तभाव दुकानदारांचे 33 लाख 80 हजार 745 एवढी अनामत रक्कम जप्तीचे आदेश पारीत करण्यात आले आहेत. 

तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेवरील लाभार्थ्यांना धान्य वितरीत करण्यामध्ये अनियमीतता करणाऱ्या परभणी तालुक्यातील मौजे किन्होळा, खानापूर येथील बि.टी. गुळवे व स्नेहा महिला बचत गट यांच्या रास्तभाव दुकानाच्या तक्रारी प्राप्त झाल्याने या रास्तभाव दुकानाचे प्राधिकारपत्र निलंबीत करण्यात आले आहेत. ज्या रास्तभाव दुकानदारांनी आनंदाचा शिधाजिन्नससाठी भरणा करावायाची रक्कम सात दिवसात न भरल्यास तसेच लाभार्थ्यांना धान्य वितरणात कोणत्याही प्रकारची कसूर केल्यास संबंधिताचे नावावरील रास्तभाव दुकानाचे प्राधिकारपत्र निलंबत करण्याची कारवाई जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून करण्यात येणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणविरकर परभणी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या