🌟यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून आदरांजली वाहण्यात आली🌟
परभणी (दि. ३० जानेवारी) : भारतीय स्वातंत्र्य संग्रामात प्राणार्पण करणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून आदरांजली वाहण्यात आली.
जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, जीवराज डापकर, शैलेश लाहोटी, तहसीलदार संदीप राजापुरे, सुरेश घोळवे, अप्पर कोषागार अधिकारी निळकंठ पाचंगे यांच्यासह अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते.....
****
0 टिप्पण्या