🌟मुख्यमंत्री साहेब, बीडसह दुष्काळजन्य भागात कृत्रिम पाऊस पाडा - गंगाधर काळकुटे पाटील


🌟अशी मागणी राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष गंगाधर काळकुटे पाटील यांनी केली🌟

मुंबई प्रतिनिधी

बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाने मागील दीड महिन्यापासून उघडीप घेतली आहे. पाऊस नसल्याने खरीप पीक माना टाकत आहे. पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर होत आहे. संभाव्य पाणी संकट लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब बीड जिल्हासह महाराष्ट्रातील ज्या भागात दुष्काळजन्य परिस्थिती भर पावसाळ्यात झाली आहे. त्या ठिकाणी कृत्रिम पाऊस पाडण्याची यंत्रणा युद्ध पातळीवर हाती घ्यावी अशी मागणी काल राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष गंगाधर काळकुटे यांनी प्रत्यक्ष भेटून निवेदाद्वारे  केली आहे.

यावर्षी पावसाने बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये अत्यल्प पावसाची हजेरी लावलेली आहे. झालेल्या तुरळ पावसावर शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने खरीप पिकाची लागवड केली. मागील दीड महिन्यापासून पावसाने अचानक उघडीप घेतली आहे. उन्हाळ्यासारखी परिस्थिती भर पावसाळ्यात निर्माण झाली आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. खरीप पिक माना टाकत आहे. शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आजच गंभीर बनला आहे. जर पावसाने अशीच पाठ फिरवली तर भविष्यात याहीपेक्षा गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागेल. पाण्याची संभाव्य गंभीर परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्राचे तारणहार, सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी, पीडितांचे कैवारी म्हणून ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे ते मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे एकमेव नेतृत्व आहेत.तेव्हा मुख्यमंत्री साहेब बीड जिल्हासह मराठवाडा व महाराष्ट्रातील ज्या ज्या भागात पावसाने पाठ फिरवली आहे.दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या ठिकाणी कृत्रिम पाऊस पाडण्याची शासकीय यंत्रणा कार्यान्वित करावी, यासंदर्भात तातडीने निर्णय घ्यावेत आणि प्रत्यक्ष तात्काळ अमलबजावणी करावी अशी मागणी राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष गंगाधर काळकुटे पाटील यांनी केली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या