🌟पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा निषेध : पत्रकारावर हल्ला करणार्‍या हल्लेखोरावर कारवाई करण्याची मागणी....!


🌟उपविभागीय पोलिस अधिकारी व शहर ठाणेदार यांना देण्यात आले निवेदन🌟

✍🏻फुलचंद भगत

मंगरुळपीर - लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार ओळखला जातो.पत्रकार सातत्याने समाजातल्या उपेक्षित व दुर्लक्षित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. जयस्तंभ चौक कारंजा येथे अवैध धंदे सुरू असल्याचे बहुजन पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बंडूभाऊ इंगोले यांना माहिती होताच ते त्या ठिकाणी जाऊन त्या दुकानाचा फोटो काढत होते, त्यादरम्यान तेथील उपस्थितांनी त्यांच्यावर  भ्याड हल्ला केला. सदर हल्ल्याचा सर्व पत्रकार बांधवांना निषेध करून दिनांक 29 ऑगस्ट रोजी कारंजा शहरचे ठाणेदार व दिनांक 30 ऑगस्ट रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कारंजा यांना निवेदन देऊन पत्रकार हल्ल्याचा निषेध केला व हल्ला करणाऱ्या वर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

 याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक 29 ऑगस्ट रोजी जयस्तंभ चौकातील वरली मटका व अवैद्य धंद्याची बातमी घेण्यासाठी बहुजन पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बंडूभाऊ इंगोले गेले असता तेथे उपस्थित लोकांनी बंडूभाऊ इंगोले यांच्यावर भ्याड हल्ला केला.यापूर्वी सुद्धा बातमी घेण्यासाठी गेलेल्या प्रतिनिधींना  गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली. अशा प्रकारे पत्रकारावर होत असलेले हल्ले कोणाच्या आशीर्वादाने होत आहे?असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. त्यामुळे त्या हल्ल्यातील हल्लेखोर शोधून त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत कार्यवाही करावी व कारंजा तालुक्यातील व शहरातील सर्व अवैध धंदे बंद करावे अन्यथा पत्रकार संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, तसेच बंडूभाऊ इंगोले यांच्या जीवितास काही झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी हे पोलीस प्रशासनाची व अवैध धंदे करण्याची राहील अशा आशयाचे निवेदन 29 ऑगस्ट रोजी कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार व 30 ऑगस्ट रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कारंजा यांना निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.सदर निवेदन देतेवेळी कारंजा तालुक्यातील बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते. त्यामध्ये बंडूभाऊ इंगोले, हमीद शेख,सुनील फुलारी, मोहंमद मुन्नीवाले ,सतीश शर्मा,आशिष धोंगडे, सलीम खान शेर खान, राजेश वानखड़े,पवन कुमार कदम, उल्हास ठाकरे, साजिद शेख, सय्यद आसिफ, गालीब पटेल, दामोदर जोंधळेकर, ज्ञानेश्वर वरघट, कालुबाई तवगड, दिगंबर सोनोणे, शेषराव वरठी, गजानन टोम्पे,मयूर राऊत ,उषाताई नाईक, सुनिता डोईफोडे, मोनाली गणवीर,अब्रार पठाण, सागर राणा अंभोरे, विजय भड, रहीम गारवे, इस्माईल बेनीवाले,मंगेश बाबरे, नरेंद्र बोरकर, हाफिज शेख, रमेश देशमुख, विजय खंडार, राजेंद्र श्यामसुंदर,प्रकाश राठोड, सुधाकर गर्जे, प्रा.कृष्णकुमार लाहोटी,प्रा.दिनेश रघुवंशी,संदीप कुरहे,निलेश मूंदे आदि पत्रकार बांधव उपस्थित होते.

दिनांक 29 ऑगस्ट रोजी पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यातील हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.आमचे पोलीस सदर प्रकरणाचा तपास करत आहे. लवकरच आरोपींना शोधून गुन्हे दाखल करण्यात येईल व शहरातील अवैद्य धंदे बंद करण्यात येतील असे पोलिसांनी सांगीतले.शहरात प्रचंड प्रमाणात अवैध्य धंदे वाढलेले असून या वाढलेल्या धंद्यासाठी जबाबदार कोण ?यासाठी संबंधित यंत्रणा आणि पोलीस प्रशासन या अवैध धं्यांना पाठीशी घालीत असल्याने हे याची हिम्मत वाढलेली आहे त्यामुळे आता हल्लेखोर असलेल्या ना तत्काळ शासन होणे गरजचे आहे  पत्रकारावर होणारे हल्ले हे लोकशाहीवर हल्ले आहेत त्यामुळे पत्रकरावील हल्ल्यांना पत्रकार संरक्षण कायदा अतरगत कार्य वाही करावी अन्यथा आम्ही आंदोलन उभारू असा इशारा जेष्ठ पत्रकार सुधाकर कर्जे यांनी दिला आहे.....



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या