🌟मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ : कायद्या सुव्यवस्था राखण्यास सरकार अपयशी....!


🌟विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचे सरकारवर टीकास्त्र🌟

✍️ मोहन चौकेकर 

मुंबई (दि.०३ ऑगस्ट २०२३)  - राज्यातील वाढते गुन्हे पाहता  नागपूर शहरात ३३२.९१ टक्के तर ठाणे जिल्ह्यात १८४.३३ टक्के इतके गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्या ठाणे, नागपूर जिल्हयात गुन्हेगारीत मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. मुंबई ठाण्यात पहाटेपर्यंत डान्सबार सुरू असून राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असल्याचे टीकास्त्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर ओढले आहे. 

* वारकऱ्यांवर झालेला लाठीहल्ला :-

कायद्या सुस्थापित राखण्यास सरकारला आलेले अपयश, राज्याची ढासळलेली आर्थिक स्थिती, विस्कळीत झालेलं जनजीवन आदी मुद्द्यांवरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर धारेवर धरले.आताच सरकार हे मूठभर सत्ताधाऱ्यांचे हित राखण्यात व्यस्त आहे असा आरोप अंबादास दानवे यांनी अंतिम आठवड्यावरील प्रस्तावावर भाषण करताना केला. 

राज्यात कायद्याचा धाक राहिला नसल्यामुळे  दंगलीच्या घटना, दिवसा मुलींवर होत असलेले हल्ले, अत्याचाराच्या घटना यात वाढ झाली आहे. प्रशासकीय यंत्रणेतील अभियंतावर हात उगारणाऱ्या सत्ताधारी आमदार यांच्यावर सरकार कारवाई करत नाही मात्र विरोधी पक्षाच्या आमदारावर कारवाईचा बडगा उचलतो, एकप्रकारे सरकार दुटप्पी भूमिका बजावत असल्याचा आरोपही अंबादास दानवे यांनी केला.

इंग्रजांच्या काळातही झालं नाही अशाप्रकारे या सरकारच्या काळात वारकऱ्यांवर लाठीमार झाला. राज्यात ठिकठिकाणी होत असलेल्या दंगलीच्या घटना या एकप्रकारे कोणी तरी षड्यंत्र रचत असल्याचा गंभीर आरोप अंबादास दानवे यांनी करत सरकारच्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला.महिला लोकप्रतिनिधींवर अश्लील टीका करणे, महापुरुषांचा अवमान करणे अशा कृतीतून काहीजण स्वतःची प्रसिद्धी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा फॅड फोफावल असल्याची टीकाही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांवर केली.

* केंद्राकडून राज्यावर होतेय सापत्नीक वागणूक :-

राष्ट्रीय विकासदरात राज्याचे योगदान हे १४ टक्के असताना केवळ राज्याला ७ टक्के निधी देण्यात आला. याउलट उत्तर प्रदेश राज्याचे योगदान हे ७ टक्के असताना केंद्राकडून त्या राज्याला १८ टक्के निधी देण्यात आला महाराष्ट्र राज्याच्या वाट्याला ६४ हजार कोटी तर उत्तर प्रदेश राज्याला १ लाख ८३  हजार ७ कोटी आले. अशाप्रकारे १५ व्या वित्त आयोगात राज्यावर केंद्राकडून अन्याय व सापत्नीक वागणूक दिली गेल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.

 केंद्राकडून जितका कर महाराष्ट्र राज्यातून केंद्राला दिला जातो तितका वाटाही केंद्राकडून दिला जात नाही, एकप्रकारे महाराष्ट्र राज्याला कमकुवत करण्याचा प्रयत्न केंद्राकडून होत आहे राज्यात मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री असून ते मोठया घोषणा करतात मात्र राज्याच्या वाट्याला काही आणत नाही अशी टीकाही देखील अंबादास दानवे यांनी केली. 

राज्यावर ७ लाख ७ हजार कोटी रुपयांचे कर्जाचा डोंगर आहे. हे कर्ज पाहता जनतेच्या डोक्यावर प्रत्येकी ५६ हजार ८७० कोटी रुपयांचे कर्ज आहे. महाराष्ट्र देशाला दिशा देणार राज्य आहे मात्र या सरकारच्या काळात  राज्याचे धिंदोडे निघाले असल्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले सरकार स्वतःला गतिमान म्हणत मात्र त्यांची गती स्वतः च्या विकासावर गेली अशी टीका देखील अंबादास दानवे यांनी केली.

* माधवराव गाडगीळ समितीच्या सूचनांचे सरकारने काय केले :-

इरसालवाडी दुर्घटनेपूर्वी महसूल विभागाकडे तेथील ग्रामस्थांनी वारंवार पुर्नवसनाची मागणी केली. मात्र तिचा विचार केला गेला नाही सरकार ही दुर्घटना घडण्याची वाट बघत होती का? माधवराव गाडगीळ समिती ने दरड कोसळण्यावर अभ्यास केला होता त्या कोणत्याही सुचनेची दखल सरकारने घेतली नाही तळये गावाचे पुर्नवसन करण्याची गरज असून गाडगीळ समितीच्या सूचनेची दखल सरकारने घेण्याची गरज असल्याचे दानवे म्हणाले. तसेच दरडी दुर्घटना रोखण्यासाठी सरकारने कोणत्या उपाययोजना अवलंबल्या असा प्रश्नही अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. 

 * सिडकोच्या माध्यमातून खासगी विकासांच्या घशात जमिनी घालण्याचा घाट :-

पनवेल येथील वळई गावातील आदिवासी कुटुंबियांची ९० एकर जमीन भूसंपादन करण्याचं काम राज्य सरकारने हाती घेतल आहे. सिडकोच्या माध्यमातून पुर्नवसनाच्या नावाखाली खासगी विकासकांच्या घशात जमिनी घालण्याचा काम सरकारकडून केलं जातंय असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.बारसू येथे १३५ परप्रांतीयांनी जमिनी खरेदी केल्या त्यांच्या हितासाठी जमीन भूसंपादन करून नैसर्गिक जागेचा ऱ्हास केला जातोय असा आरोप दानवे यांनी सरकारवर केला.

* समृद्धी मार्ग :-

समृद्धी महामार्गाचा रस्ता अपूर्ण असूनही तेथे पूर्ण टोल घेतला जातो. तेथे प्रवाशांसाठी कोणत्याही सुविधा नसल्याबाबत अंबादास दानवे यांनी येथील असुविधेवरून सरकारला सुनावले.रेवस रेड्डी सागरी महामार्गचे टेंडर निघूनही काम थांबवल्याबाबत त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले.                                             

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या