🌟परभणी जिल्ह्यात बियाणे,खते व किटकनाशकांच्या गुणवत्तेतील अडचणी निवारणासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना....!


🌟शेतकऱ्यांना कृषि विभागाचा टोल फ्री क्रमांक 18002334000 क्रमांकावर सुद्धा संपर्क करता येईल🌟

परभणी (दि.०५ जुलै २०२३): महाराष्ट्र राज्यामध्ये शेती क्षेत्राच्या दृष्टीने खरीप हंगामाचे महत्व अनन्यसाधारण आहे. राज्यातील बहुतांश शेतकरी खरीप हंगाम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत असतात. अशावेळी गुणवत्तापूर्ण निविष्ठा म्हणजेच बियाणे, खते व किटकनाशके यांचा पुरवठा वेळेत व मुबलक प्रमाणात होणे अत्यावश्यक आहे. बियाणे, खते व किटकनाशकांच्या गुणवत्ता व पुरवठ्याबाबत राज्यातील शेतकरी उत्पादक, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीयस्तरावर येणा-या वेगवेगळ्या अडचणींचे निवारण करण्याकरिता आयुक्तालयस्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात येत असून, सदर नियंत्रण कक्षाशी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी 24 तास संपर्क साधण्यासाठी संपर्काचा भ्रमणध्वणी क्रमांक 8446117500, 8446221750,8446331750 उपलब्ध करुन देण्यात आला आहे तसेच कृषि विभागाचा टोल फ्री क्रमांक 18002334000 क्रमांकावर सुद्धा संपर्क करता येईल. 

या सोबतच अडचण किंवा तक्रार controlroom.qc.maharashtra@gmail.co m वर सुद्धा मेल द्वारे पाठवता / नोंदवता येईल. संबंधीतांनी, उपरोक्त नमुद भ्रमणध्वणी टोल फ्री क्रमांक तसेच ई-मेलवर येणा-या अडचणी व निविष्ठांची गुणवत्ता, किंमत. साठेबाजी व लिंकींगबाबत असलेल्या तक्रारी नोंदवताना, नाव, पत्ता, संपर्क क्रमांक व अडचणी किंवा तक्रारीचा संक्षिप्त तपशिल द्यावा. सदर माहिती कोऱ्या कागदावर लिहून त्याचा फोटो Whats app किंवा ई-मेलवर पाठवल्यास सुध्दा आपल्या तक्रारींचे निराकरण करणे सोईस्कर होईल. ज्या शेतकऱ्यांना Whats app चा वापर करणे शक्य नसेल त्यांनी उपरोक्त क्रमांकावर तोंडी तक्रारी नोंदवाव्यात. शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी एकुण 3 भ्रमणध्वणी, 1 टोल फ्री क्रमांक व 1 ई मेल तक्रार निवारणासाठी समर्पीत केलेले असुन, त्यावर शेतकऱ्यांना त्यांच्या तक्रारी नोंदवण्याचे आवाहन कृषि संचालक (निवगुनि) विकास पाटील यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या