🌟परभणी जिल्ह्यातील मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक रद्द.....!

                             


 🌟निवडणूक निर्णय अधिकारी जयंत पाठक यांनी दिले निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात येत असल्याचे आदेश🌟 

मानवत (दि.२३ एप्रिल) :- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सहकार्य सेवा संस्था मतदार संघात निवडणूक लढवण्यासाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवाराचे शुक्रवारी निधन झाल्याने निवडणुकीत ट्विस्ट आला.हा प्रसंग निर्माण झाल्याने प्रक्रियला स्थगिती मिळणार असल्याची चर्चा सुरू होती शेवटी 23 एप्रिल रोजी निवडणूक निर्णय अधिकारी जयंत पाठक सुरु असलेली बाजार समिती निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे आदेश दिले आहेत .बाजार समितीच्या 18 संचालकासाठी 51 उमेदवार रिंगणात उतरले होते .अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर 21 एप्रिल रिंगणात असलेल्या उमेदवारांना चिन्ह वाटप होणार होते .मात्र तालुक्यातील मंगरूळ येथील उमेदवार रावसाहेब कदम यांनी  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विविध कार्यकारी सेवा संस्था मतदारसंघात अर्ज दाखल केला होता .मात्र 21 एप्रिल रोजी सकाळी 10.00 च्या सुमारास कदम यांचं अल्पशा आजाराने निधन झाले.निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांचे निधन झाल्याने निवडणूक प्रक्रिया थांबवावी अशी मागणी वी ज भ ज प्रवर्गातून निवडणूक लढवीत असलेले उमेदवार गणेश नाईक यांनी निवडणूक निर्णय अधिकारी जयंत पाठक यांच्याकडे लेखी अर्जा द्वारे केली.यानंतर निवडणूक प्रक्रियेचे काय होणार निवडणुकीयानंतर निवडणूक प्रक्रियेचे काय होणार निवडणुकीला स्थगिती मिळणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. 22 एप्रिल रोजी मंगरूळ भू येथील ग्रामपंचायत कार्यालयाकडून मृत्यू दाखला प्रमाणपत्र आणि अहवाल प्राप्त झाल्यानंतर22 एप्रिल रोजी मंगळूर येथील ग्रामपंचायत कार्यालयाकडून मृत्यू दाखला प्रमाणपत्र आणि अहवाल प्राप्त झाल्यानंतर23 एप्रिल रोजी निवडणूक निर्णय अधिकारी जयंत पाठक यांनी 28 एप्रिल रोजी बाजार समितीसाठी होणारी मतदार प्रक्रिया रद्द करण्यात आले बाबतचे आदेश काढण्यात आले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या