🌟सशस्त्र क्रांती घडवण्याचा कोणाचा फुसका बार ?


🌟आज १३ एप्रिल : जालियनवाला बाग हत्याकांड दिवस🌟

 _भारतभर या हत्याकांडाच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. नोबेल पारितोषिक विजेते गुरू रविंद्रनाथ टागोर यांनी त्यांना इंग्रजांनी दिलेली "सर" ही पदवी परत केली. या हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी अनेक क्रांतीकारक जन्माला आले. शहिद उधमसिंग- जे स्वतः या हत्याकांडामधे जखमी झाले होते, त्यांनी दि.१३ मार्च १९४० या दिवशी या हत्याकांडाचे उत्तर म्हणून मिशाएल ओ डायर- जो या हत्याकांडाचा सुत्रधार होता त्यांवर बंदुकितून गोळ्या झाडुन वध केला. सदर रोमांचक माहिती अलककार- श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजींच्या शब्दांत जरूर वाचाच... संपादक.


    अमृतसर अखंड भारतातील पंजाब राज्यातील एक महत्त्वाचे शहर होते. दि.१० एप्रिल १९१९ रोजी सकाळी एक घोळका अमृतसरच्या डेप्युटी कमिशनरच्या घराकडे जात होता. कारण होते दोन प्रसिद्ध स्वातंत्र्यवीरांच्या सुटकेची मागणी. सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलु असे दोन वीर ज्यांच्या विरुद्ध तडीपार करण्याचा आदेश जारी करण्यात आला होता. या घोळ्क्यावर सैन्याच्या एका तुकडीने बेछूट गोळीबार केला. त्याचे पडसाद त्याच दिवशी उमटले. ब्रिटिश सरकारच्या अस्तित्वाची जाणीव करून देणाऱ्या ईमारतींना आग लावण्यात आली. टाउन हॉल, दोन बँकाच्या इमारती, तारघर, रेल्वेचे गोदाम आदी आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. गुरखा रेजीमेंटने रेल्वे स्थानकाचा बचाव केला. रेल्वे गोदामाच्या एका युरोपीयन रक्षकाला जोरदार मारहाण करण्यात आली. तीन बँक कर्मचारी आगीत ठार झाले, तर एका युरोपीयन नागरिकाचा रस्त्यात खून करण्यात आला. एका ब्रिटिश महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला, परंतु काही भारतीयांनी तिचे प्राण वाचविले. दिवसभर हे थैमान चालू होतेच. ब्रिटिश सैन्याने दिवसभरात केलेल्या गोळीबारात ८-२० स्वातंत्र्य सैनिक धारातीर्थी पडले. या नंतरचे दोन दिवस अमृतसर शांत होते, पण पंजाबमधील इतर भागात मात्र हिंसा चालू होतीच. रेल्वेचे रूळ उखडण्यात आले, तारघर, डाकघर, सरकारी ईमारतींना आगी लावण्यात आल्या, ३ युरोपीयन नागरिक मारण्यात आले. या प्रक्षोभक दंग्यांमुळे अखेर १३ एप्रिल रोजी पंजाबमध्ये मार्शल लॉ जारी करण्यात आला.

    दि.१३ एप्रिल १९१९ या दिवशी इंग्रजांच्या भारतावरील राजवटीत ब्रिगेडियर-जनरल रेजिनाल्ड डायर याने अमृतसर येथील जालियनवाला बाग या ठिकाणी हे हत्याकांड घडवून आणले. योगायोग असा की १३ एप्रिलला पंजाबी जनतेचा प्रिय सण बैसाखी सुद्धा होता. रिवाजानुसार हिंदू आणि शीख बांधव सण साजरा करण्यास एकत्र जमले. प्रचंड जनसमुदाय जालीयनवाला बागेत जमला होता. पण मार्शल लॉमुळे जमावबंदी लागू होती. पाच किंवा त्याहून जास्त जणांचा जमाव नियमबाह्य होता. जनरल डायर याच्या हुकुमावरून लष्कराने निशस्त्र लोकांच्या सभेवर रायफलींच्या सोळाशे फैरी झाडल्या. या सभेत स्त्रिया आणि पुरूषांसोबत लहान मुलांचाही समावेश होता. अधिकृत सूत्रांच्या हवाल्यानुसार या हत्याकांडामधे चारशे लोकांचा मृत्यू झाला. अनाधिकृत सूत्रांनुसार मृतांचा आकडा एक हजारहून अधिक आहे. भारतभर या हत्याकांडाच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. नोबेल पारितोषिक विजेते गुरू रविंद्रनाथ टागोर यांनी त्यांना इंग्रजांनी दिलेली "सर" ही पदवी परत केली. या हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी अनेक क्रांतीकारक जन्माला आले. शहिद उधमसिंग- जे स्वतः या हत्याकांडामधे जखमी झाले होते त्यांनी दि.१३ मार्च १९४० या दिवशी या हत्याकांडाचे उत्तर म्हणून मिशाएल ओ डायर- जो या हत्याकांडाचा सुत्रधार होता त्यांवर बंदुकितून गोळ्या झाडुन वध केला.

    दि.२० जुलै १९०५ रोजी सरकारने बंगालची फाळणी करण्याचा निर्णय जाहीर केला आणि ठिणगी पडली. सरकारचा दावा असा होता, की प्रशासकीय विचारांतून हा निर्णय घेण्यात आला आहे. पण त्यामागे राष्ट्रवादी विचारांच्या बंग जनतेची फाळणी करण्याचा हेतू आहे, हे जनतेने ओळखले होते. १६ ऑक्टोबर रोजी कलकत्यात सार्वत्रिक हरताळ पाळण्यात आला व लोकांनी एक दिवस उपोषण केले. कलकत्याच्या अनेक रस्त्यांवरून मिरवणुका निघाल्या व संध्याकाळी विशाल सभा झाली. त्यात पन्नास हजार लोक हजर होते. बंगालच्या खेड्यापाड्यांतून आणि शहराशहरांतून सभा, मिरवणुका व निदर्शने यांचे पडसाद सतत उमटत होते. परकीय बनावटीच्या सर्व वस्तूंवर बहिष्कार व त्याऐवजी स्वदेशी वस्तूंचा वापर, हे या चळवळीचे सूत्र होते. अनेक ठिकाणी परदेशी कापडाच्या होळ्या पेटवण्यात आल्या आणि परदेशी कापड विकणाऱ्या दुकानांपुढे निदर्शने करण्यात आली. शाळा, कॉलेजांवर बहिष्कार, न्यायालये व सरकारी नोकऱ्यांचा त्याग, असे या असहकार आंदोलनाचे स्वरूप होते. मात्र कार्यक्रमांतील हा भाग परिणामकारकरीत्या अमलात येऊ शकला नाही. परकीय जोखडातून स्वातंत्र्य, अशीही नव्या नेतृत्वाने हाक दिली. त्याचाच एक परिणाम म्हणजे डिसेंबर १९०६ मधील काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून बोलतांना दादाभाई नौरोजींनी स्पष्ट केले, की स्वराज्य हेच काँग्रेसचे उद्दिष्ट आहे. खेड्यातील आणि शहरातील सर्वसामान्य जनतेला या चळवळीत सहभागी होण्याची प्रेरणा देण्यात हे नवे नेतृत्व विलक्षण यशस्वी झाले. विशेषतः विद्यार्थी, महिला आणि शहरी भागातील कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने या आंदोलनात सहभागी झाले. स्वदेशी आणि स्वराज्य या घोषणा लवकरच इतर प्रांतांतही प्रसृत झाल्या. परदेशी कापडांवरील बहिष्काराचे आंदोलन तर अखिल भारतीय पातळीवर संघटित करण्यात आले. समान सहानुभूती व समान राजकारण या बंधनांनी सारा देश आता एक होऊ लागला. सरकारने दडपशाहीनेच या आंदोलनास उत्तर दिले. सभांवर बंदी घालण्यात आली. वृत्तपत्रांचा आवाज दडपून टाकण्यात आला. राजकीय कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. अनेक नेत्यांना परदेशी हद्दपार करण्यात आले आणि विद्यार्थ्यांना मारझोड करण्यात आली. सरकारने जहालांपासून मवाळांना व हिंदूपासून मुसलमानांना वेगळे काढण्याचे प्रयत्न केले. जनता आता जागृत झाली होती, मात्र तिला योग्य अशा संघटनेत बांधण्यात व लढ्याला योग्य दिशा देण्यात नवे नेतृत्व अयशस्वी ठरले. उदाहरणार्थ निःशस्त्र प्रतिकाराची चळवळ प्रत्यक्षात आली नाही. अखेर लोकमान्य टिळकांना जेव्हा सहा वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा झाली. बिपिनचंद्र पाल व अरविंद घोष यांनी राजकारण संन्यास घेतला व लाला लजपत राय परदेशी गेले तेव्हा सरकारला ही चळवळ दडपून टाकणे शक्य झाले.

       मोठ्या जन आंदोलनात परिणामकारक सहभागाची संधी न मिळाल्याने व सरकारी दडपशाहीचा प्रतिकार करण्यास कोणतीच बाब न राहिल्याने युवा वर्ग दहशतवादी क्रांतिकारी मार्गाकडे वळला आणि तिरस्करणीय अधिकाऱ्यांची हत्या करणे, हीच त्यांच्या राजकीय कार्याची पद्धत बनली. अनुशीलन व युगांतर हे त्या काळातील दोन प्रमुख दहशतवादी गट होते. या क्रांतिकारी दहशतवाद्यांना जनतेच्या पाठिंब्याचा आधार नव्हता व म्हणूनच ती चळवळ फार काळ टिकू शकली नाही. पण राष्ट्रीय चळवळीतील त्यांचेही योगदान मोलाचे आहे. इसवी सन १९०९पासून १९१६पर्यंत राष्ट्रवादी चळवळ सुप्त स्थितीत होती, परंतु पहिल्या महायुद्धाच्या काळात भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगणाऱ्या इंग्रज विदुषी अ‍ॅनी बेझंट यांनी आणि करावासातून मुक्त झालेल्या लोकमान्य टिळकांनी इंडियन होमरुल लीगच्या संरक्षणासाठी सनदशीर मार्गाने अखिल भारतीय आंदोलन पुन्हा सुरू केले. युद्धकाळात परदेशातील क्रांतिकारी कार्यकर्ते सुद्धा क्रियाशील होते. त्यात अमेरिकेत व कॅनडात स्थापन झालेल्या व पूर्व आणि आग्नेय आशियात शाखा असलेल्या गदर पक्षाचा विशेष उल्लेख केला पाहिजे. त्यानेच भारतात सशस्त्र क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न केला.  

!! जंग ऐ अजित न्युज परिवारातर्फे जालियनवाला बाग हत्याकांड दिनी शहीद झालेले सर्व क्रांतिवीर व निष्पाप जनता यांना विनम्र अभिवादन !!


 अलककार- श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी.

 रामनगर- गडचिरोली, व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या