💥संत संताजीं जगनाडे महाराजांचा संपूर्ण जीवनपट व त्यांची माहिती.....!


💥पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चाकण गावी त्यांचे वास्तव्य होते💥

✍️ मोहन चौकेकर

संत संताजी  जगनाडे महाराज (अंदाजे इ.स. १६२४ - इ.स. १६८८) हे संत तुकाराम महाराजांनी रचलेल्या अभंगांच्या संग्रहाचे - अर्थात तुकाराम गाथेचे - लेखक - लेखनिक होते. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चाकण गावी त्यांचे वास्तव्य होते.

* संत संताजी जगनाडे महाराजांचे बालपण :-


संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ रोजी महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील चाकण या गावी विठोबा जगनाडे यांच्या घरी झाला. विठोबा जगनाडे व आई मथाबाई हे विठ्ठलभक्त होते, त्यामुळे संत संताजीं जगनाडे महाराजांवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. तेल्याचे घर असल्यामुळे मुलांला हिशोब करता येणे गरजेचेच असते त्यामुळे संत संताजी जगनाडे महाराजांनाही देखील लिहिता वाचता आणि हिशोब करता येईल एवढे शिक्षण घेतले होते. घरची परिस्थिती चांगली होती त्यामुळे संत संताजी जगनाडे महाराजांना कसली कमी पडली नाही संत संताजी महाराजावर वर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. कीर्तनाला, भजनाला जाण्याची सवय लागली. कीर्तनाची आवड त्यांच्यात बालपणीच निर्माण झाल्यामुळेच ते नंतर संत तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकऱ्या पैकी एक झाले होते.

* संत संताजी जगनाडे महाराजांचा विवाह :-

संत संताजीं जगना महाराजांचे शिक्षण तसे फक्त हिशोब करण्यापुरतेच झाले. आणि ते झाल्यानंतर त्यांनी आपल्या पारंपरिक व्यवसाय म्हणजे तेल गाळण्यास सुरुवात केली. त्याकाळी बालविवाहाची प्रथा होती त्यामुळे संत संताजी जगनाडे महाराजांचा विवाह वयाच्या १२ व्या वर्षीच यमुनाबाईशी विवाह झाला व ते संसाराच्या बेडीत अडकले. आणि आता त्यांचे लक्ष फक्त कुटुंबावरच लागले. त्याच बरोबर त्यांना जसा वेळ मिळेल त्यानुसार भजनाला कीर्तनाला ही जात असत. त्यांच्यावर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार असल्यामुळे त्यांचे कुटुंबापेक्षा जास्त लक्ष सामाजिक कार्यात होते.

* संत संताजी जगनाडे महाराजांची गुरु तुकाराम महाराजांची भेट :-

त्या काळी संतांचे समाजाला कीर्तनांच्या आणि अभंगांच्या माध्यमातून शिकवण देण्याचे कार्य चालू होते. तेव्हा संत तुकाराम महाराजांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात झाली होती. असेच एकदा तुकाराम महाराज संताजींच्या गावी कीर्तनासाठी आले होते. त्यांची कीर्तने ऐकून संत संताजी जगनाडे महाराजांवर  तुकारामां महाराजांचा मोठा प्रभाव पडला व त्यांनी संसार सोडण्याच्या निर्णय घेतला. तेव्हा संत तुकारामां महाराजांनी संत संताजी जगनाडे महाराजांना समजावून सांगितले, की संसारात राहूनही परमार्थ साधता येतो. आणि तेव्हापासून संत संताजी जगनाडे महाराज  हे संत तुकारा महाराजांच्या  टाळकऱ्यांमध्ये सामील झाले. संत तुकारा महाराजांच्या  सावलीत राहून त्यांनी तुकाराम महाराजांचे अभंग उतरवून घेण्यास सुरुवात केली.*

* संत तुकाराम महाराजांच्या गाथांचे पुनर्लेखन संत संताजी जगनाडे महाराजांनी केले होते :-

संत तुकाराम महाराज यांचा जसा लोकांवर प्रभाव वाढत जात होता, ते त्या काळातील काही लोकांना  सहन होत नव्हते  त्यां लोकांनी संत तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या अभंगांची गाथा इंद्रायणी नदीमध्ये बुडवून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु संत तुकारामांचे सर्व अभंग हे संत संताजी महाराजांना मुखोद्गत होते म्हणून त्यांनी ते पुन्हा लिहून काढले.

* संत संताजी जगनाडे महाराजांचा इहलोकाचा त्याग :-

शेवटच्या क्षणी माती टाकण्यास येणार असे वचन संत तुकारा महाराजांनी संत संताजी जगनाडे महाराजांना दिले होते. परंतु संत तुकाराम महाराज हे संत संताजी जगनाडे यांच्या अगोदरच वैकुंठाला / स्वर्गात गेले होते. संत संताजी जगनाडे महाराज वारले तेव्हा अंत्य संस्काराच्यावेळी कितीही प्रयत्न केले तरी काही संत संताजी जगनाडे महाराजांचे  पूर्ण शरीर गाडले जात नव्हते, त्यांचा चेहरा वरच राहत होता. तेव्हा वैकुंठाहून संत तुकाराम महाराज आपले वचन पूर्ण करण्यासाठी आले व त्यांनी तीन मुठी माती टाकल्यानंतर संत संताजीं जगनाडे महाराजांचा पूर्ण देह झाकला गेला.....

✍️मोहन चौकेकर                                                                       

 संत संताजी जगनाडे महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन✍️ 

पत्रकार मोहन चौकेकर मराठी पत्रकार परिषद बुलढाणा जिल्हा प्रसिध्दी प्रमुख

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या