💥पुर्णा तालुक्यातील माहेरच्या मुख्य रस्ता दुरुस्तीकडे लोकप्रतिधी/प्रशासनाचे दुर्लक्ष : माहेरकरांनी शोधला अनोखा पर्याय..!


💥निद्रिस्त लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी माहेरच्या गावकरी मंडळींनी चक्क बोलीद्वारे गावच काढले विक्री💥


पूर्णा (दि.२५ सप्टेंबर) - तालुक्यातील माहेर या गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून माहेर पाटीपासून ते गावापर्यंतचा तब्बल ३ किलोमीटरचा मुख्य रस्ता तयार करून देण्यासाठी ग्रामस्थांकडून उपोषण देखील करण्यात आले होते यावेळी उपोषणास जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेट देऊन रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात लेखी आश्वासन देऊनही अद्याप रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही.या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेले लेखी आश्वासन देखील फोल ठरल्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींसह प्रशासन देखील ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्यास अपयशी ठरल्याचा आरोप करीत माहेर ग्रामस्थांनी निद्रिस्त प्रशासनासह अकार्यक्षम लोकप्रतिनिधींना जागविण्यासाठी चक्क बोलीद्वारे माहेर गावच विक्री काढल्याचा अनोखा प्रकार  गुरुवार दि.२२ सप्टेंबर २०२२ रोजी समोर आला आहे.


पुर्णा तालुक्यातील ताडकळस ते पालम राज्य रस्त्यावर पश्चिमेस साडेतीन किलोमीटर अंतरावर असलेल्या माहेर गावाची लोकसंख्या ५०० एवढी असून अत्यंत कमी लोकसंख्या असलेले माहेर हे छोटेसे गाव आहे मात्र या गावाला इतर गावासह तालुक्यातील शासकीय मुख्यालयाशी तसेच जिल्ह्याशी जोडणारा दळणवळणासाठीचा पक्का रस्ता देखील नाही देशाला जुलमी इंग्रजांपासून सन १९४७ साली तर मराठवाड्याला अत्याचारी रझाकार शाहीपासून सन १९४८ साली स्वातंत्र्य मिळाले स्वातंत्र्याच्या ७४ वर्षात देखील माहेर गावचे ग्रामस्थ मुलभुत नागरी सुख सुविधांपासून वंचित असल्याचा गंभीर प्रकार समोर आल्यामुळे सर्वत्र तिव्र असंतोष पसरला आहे  मागील १६ वर्षापूर्वी म्हणजेच २००५ मध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने या रस्त्याचे खोदकाम व मातीकाम करण्यात आले होते. त्यानंतर या रस्त्याचे पूर्णा तालुक्यातील माहेर पाटीपासून ते गावापर्यंतचा ३ किलोमीटर पर्यंतचा रस्ता तयार करण्यात यावा, या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या ग्रामस्थांना तत्कालीन जिल्हाधिकारी व गावास भेट देण्यास आलेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आश्वासन दिले. त्यानंतर या रस्त्यावर कच्चे खडक टाकण्यात आले. मात्र, रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही.

सद्यपरिस्थितीत बानेगाव थांबा ते माहेर या ३ किलोमीटर रस्त्यावर सतत आठ महिने तब्बल दोन ते तिन फुट सारखा चिखल झालेला असतो या चिखलातून ग्रामस्थांना तालुक्यासह जिल्हाचे ठिकाण गाठण्यासाठी अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते. तसेच गरोदर मातांना-भगिनींसह,आजारी रुग्णांना,वृध्दांना रूग्णालयात नेणे अवघड झाले आहे. मागील वर्षी शालेय पोषण आहाराचा ट्रक रस्त्याअभावी वापस गेल्याने सर्व तालुक्यासह जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा फौज फाटाने गाव गाठले. विशेष म्हणजे तहसीलदार,गटविकास अधिकारी यांना आपल्या गाड्या गावाबाहेर सोडून पायीच गावात यावे लागले  त्यावेळी लवकरात लवकर रस्त्याचे काम मार्गी लावू, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र या घटनेला एका वर्षाचा कालावधी पूर्ण होऊन ही अद्याप गावकऱ्यांच्या रस्त्याचा प्रश्न मिटला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी २५ सप्टेंबर पर्यंत रस्त्याचा प्रश्न मार्गी नाही लागला तर गाव,घर,शेतीबाडीसह बोलीव्दारे विक्री काढणार आहोत. अशा अशयाचे निवेदन २२ सप्टेंबर रोजी तहसीलदार पल्लवी टेमकर यांना देण्यात आले आहे.

💥माहेर ग्रामस्थांनी आतापर्यंत ३ वेळा केले उपोषण :-

भारत स्वतंत्र होऊन ७५ तर मराठवाडा स्वातंत्र्य होऊन ७४ वर्ष झाले तरी अद्याप गावाला रस्ता नसल्याने ही बाब निवेदने,आंदोलने तसेच उपोषण करून जिल्हा प्रशासनाच्या वेळोवेळी निदर्शनास आणून दिली आहे. यासाठी ३१ जून २०२१,१५ ऑगस्ट २०२१,१४ ऑगस्ट २०२२ असे तीन वेळा उपोषण करण्यात आली. मात्र तरीही प्रशासनाने रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यामुळे अखेर गावकऱ्यांनी गावच विक्रीस काढले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या