💥शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज प्रसार माध्यमांशी शिवसेना भवन येथे संवाद साधला....!


💥यावेळी त्यांनी मांडलेले काही प्रमुख मुद्दे💥

 बर्‍याच दिवसांनी पत्रकारांशी फेस टु फेस भेट...नवीन सरकारचे अभिनंदन आणि या सरकारकडून महाराष्ट्राचे भले व्हावे, ही इच्छा!

- ज्यांनी हे सरकार स्थापन केले, त्यांच्या मते त्यांनी शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले. हेच तर मी सांगत होतो, जर हे पूर्वीच केलं असतं तर आता अडीच वर्षे पूर्ण झाली असती, आणि जे झाले ते सन्मानाने झालं असतं.

- तेव्हा नकार दिला, आता असं का केलं? शिवसेनेलाच बाजूला ठेवून, शिवसेनेचाच मुख्यमंत्री... असं होऊ शकत नाही.

- माझ्यावरील राग माझ्या मुंबईवर काढू  नका... मुंबईच्या काळजात कट्यार घुसेल, असं करु नका.

- हात जोडून विनंती, माझ्यावरचा राग मुंबईवर काढू नका. आरेचा आग्रह रेटू नका, पर्यावरणाला हानी पोहचवू नका. तिकडे वन्य जीवन आहे. आरेचा निर्णय बदलल्यामुळे दु:ख झाले.

- आता सरकार वरती - खालती तुमचंच  आहे. कांजुरचा प्रस्ताव दिला होता, ही जमीन मुंबईकरांची. मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका.

- लोकशाहीचे चार स्तंभ... हे चार स्तंभ आता पुढे यायला हवे, लोकशाही वाचविण्यासाठी.

- लोकशाही वाचवा, चारही स्तंभ एकत्र या. पुढे या.

- लोकशाहीचे धिंडवडे थांबवण्याची गरज आहे, ज्याने मत दिले त्याचा बाजार असा मांडला गेला तर ते चुकीचे आहे. मतदाराचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल.

- अमित शाहांनी शब्द पाळला असता, तर सरकार शानदार असतं.

- मी महाराष्ट्रातील तमाम जनतेचा ऋणी आहे. असं क्वचितच होत असेल की, एखादा माणूस जो अचानक आला तो पद सोडताना लोकांच्या डोळ्यात अश्रू येतात.

हे अश्रू माझी मोठी ताकद आहे, जय महाराष्ट्र साहेब.. आपला संघर्ष योध्दा देवा पाटील.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या