💥राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजनेची अंमलबजावणी तात्काळ करा...!


💥महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची मागणी💥

महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने विद्यार्थांसाठी नवीन योजना सुरू करण्यात आली आहे.या योजने अंतर्गत एखाद्या विद्यार्थांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्या विद्यार्थ्याला या योजनेतुन भरपाई म्हणून एक लाख पन्नास हजार रुपये , तसेच आपघातातुन अपंगत्व आल्यास, सर्पदंशाने, पोहताना विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तरी त्या विद्यार्थ्याला या योजनेतुन भरपाई मिळणार आहे.तरी या योजनेची लवकरात लवकर अमंलबजावणी करून शिक्षणाधिकारी यांनी तालुक्यातील सर्व पहिली ते आठवी व नववी ते बारावी या पध्दतीने विद्यार्थांची नोंद करून घ्यावी.आशी मागणी परभणी मनविसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत ( मुन्ना ) बिराजदार यांच्याकडून करण्यात आली आहे.....
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या