💥विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्यासह राष्ट्र घडवण्याचे सामर्थ डॉ हरीभाऊ पाटील यांच्या सारख्या शिक्षकांमध्येच असते - डॉ.गोविंद नांदेडे


💥पूर्णेत स्वा.सै.कै.स्व.दाजीसाहेब कदम प्रतिष्ठान आयोजित डॉ.हरिभाऊ पाटील कार्यगौरव सोहळा संपन्न💥

पूर्णा (दि.०३ जानेवारी) - येथील विद्या प्रसारणी सभेच्या प्राथमिक शाळेत तब्बल ३८ वर्षे सेवा करून अनेक विद्यार्थ्याचे उज्वल भविष्य घडवून दि.३१ डिसेंबर २०२१ रोजी सेवानिवृत्त झाले राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक/मुख्याध्यापक तथा रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य डॉ.हरिभाऊ पाटील यांच्या कार्यगौरव सोहळ्याचे आयोजन येथील स्वातंत्र्य सैनिक कै.स्व.दाजीसाहेब कदम पाटील प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते या कार्यगौरव सोहळ्यास राज्याचे माजी शिक्षण संचालक डॉ.गोविंद नांदेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यगौरव सोहळ्या वेळी बोलतांना डॉ.नांदेडे म्हणाले की पूर्णेकरांनी सर्वसामान्य शिक्षकाचा सेवा गौरव करुन त्यांच्या सन्मानाचे पर्वच सुरू केले आहे.विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासह राष्ट्र घडवण्याचे काम खऱ्या अर्थाने शिक्षकच करत असतात पूर्णेतील डॉ. हरीभाऊ पाटील यांच्यासारखे एक प्रयोगशील आदर्श शिक्षक कल्पक मुख्याध्यापक यांचा त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या पूर्णेकरांचा आदर्श सर्वांनी घ्यावा. असे गौरवोद्गार सेवानिवृत्त शिक्षण संचालक डॉ.गोविंद नांदेडे यांनी स्वा.सै. कै.स्व.दाजीसाहेब कदम प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात बोलताना काढले.

      पूर्णा शहरात स्वा. सै. कै. स्व.दाजीसाहेब कदम प्रतिष्ठानच्या वतीने शनिवार दि.१ जानेवारी रोजी शहरातील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य विद्याप्रसरणी शाळेचे मुख्याध्यापक डॉ.हरिभाऊ पाटील यांच्या कार्य गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी डॉ.नांदेडे बोलत होते.

      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.नगराध्यक्ष उत्तमरावजी कदम हे होते तर मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून वेदमूर्ती उमेशमहाराज टाकळीकर, खा. संजयजी जाधव, डॉ.दत्तात्रयजी वाघमारे,डॉ. द्वारकादासजी झंवर,रामनारायणजी मुंदडा गुरूजी, प्राचार्य मोहनराव मोरे, गटनेते उत्तमभैय्या खंदारे, पोलिस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड, जेष्ठ पत्रकार पंढरीनाथ धोंडगे, सुधाकर खराटे, शेख महेबुब गुरूजी, पत्रकार संतोष धारासूरकर, साहेबरावजी कदम,प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, कार्यवाह संतोषराव एकलारे आदिंची उपस्थिती होती.

     यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने प्रास्ताविक करतांना नगराध्यक्ष प्रतिनिधी तथा माजी नगरसेवक कार्यवाह संतोष एकलारे यांनी केले.सर्व मान्यवरांच्या हस्ते डॉ. हरीभाऊ पाटील यांची ग्रंथतुला करुन त्यांचा व  पत्नी सौ.भक्ती पाटील यांचा शाल,श्रीफळ व माननपत्र देऊन गौरविण्यात आले.धनगर टाकळी ग्रामस्थांच्या वतीने खा.संजय जाधव, डॉ हरिभाऊ पाटील यांचा मानाची घोंगडी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.मानपत्राचे वाचन डॉ.दिलीप शृंगारपुतळे यांनी केले.

    कार्यक्रमाचे प्रस्तावित नगराध्यक्ष प्रतिनिधी संतोष एकलारे सुत्रसंचलन जगदीश जोगदंड, आभार प्रदर्शन इंजि नागनाथ कापूसकरी यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे लक्ष्मीकांत शिंदे,विक्रम (विक्की) कदम, श्याम कदम, अँड राजेश भालेराव,गजानन हिवरे,शंकर गलांडे,अतुल शहाणे, सचिन (पप्पू) कदम, विशाल चितलांगे,अशोक अग्रवाल,पप्पू  आदींनी परिश्रम घेतले.

डॉ. हरीभाऊ पाटील यांनी पूर्णेच्या शैक्षणिक क्षेत्रासह  पत्रकारिता,सामाजिक रेल्वेच्या प्रश्नांना अभ्यासपूर्ण शैलीतून समोर आणण्याचे काम केले. यापुढील काळात त्यांनी आपले योगदान देऊन समाजाला समृद्ध करावे यासाठी ते जे प्रयत्न करतील त्यासाठी आवश्यक त्या मदतीसाठी मी खंबीरपणे पाठीशी असल्याचे सांगितले.....

साभार ; गजानन हिवरे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या