💥परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे 'रेणुका शुगर्सची' गाळप क्षमता वाढवण्याच्या मागणी साठी तीन तास रास्ता रोको...!


💥कॉ.राजन क्षिरसागर यांच्या नेतृत्वात तीन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले💥

✍️किरण घुंबरे पाटील

पाथरी:-रेणुका शुगर्स साखर कारखाण्याची गाळप क्षमता प्रतिदिन दहा हजार मेट्रीक टन करा आणि अन्य मागण्या साठी पाथरीतील सेलू कॉर्नर येथे ऊस उत्पादक संघर्ष समिती आणि किसान सभेच्या वतीने गुरूवार ३० डिसेंबर रोजी कॉ.राजन क्षिरसागर यांच्या नेतृत्वात तीन तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले या वेळी वाहतुक ठप्प झाली होती.


किसान सभेच्या नेतृत्वात पाथरी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी गुरूवारी पुन्हा पाथरीत रस्त्यावर उतरले रेणूका शुगर्स ची गाळप क्षमता वाढवा या प्रमुख मागणी सह इतरही मागण्या या वेळी आंदोलन कर्त्यांनी लाऊन धरल्या. या रस्ता रोको आंदोलनात कॉ राजन क्षिरसागर,कॉ अमोल गराम,शिवाजीराव कदम,कॉ विजय कोल्हे,कॉ नवनाथ कोल्हे,कॉ मुंजाभाऊ लिपने यांनी मार्गदर्शन केले.मागिल तीन वर्षा पासुन तालुक्यात जोरदार पर्जन्य वृष्टी झाल्याने सर्वत्र पाण्याची उपलब्धता आहे. त्यातच जायकवाडी धरन सतत तीन वर्षा पासून शंभर टक्के भरत आहे शिवाय गोदावरी नदी वरील तीन ही उच्च पातळी बंधारे पुर्ण क्षमतेने भरत असल्याने पाथरी तालुक्यातील शेतकरी ऊसाच्या पिका कडे वळला आहे. उसाचे पिक जोमदार येऊन ही त्याचे गाळप होईल की नाही ही चिंता शेतक-यांना सतावत आहे. देवनांद्रा शिवारात असलेल्या रेणूका शुगर्स साखर कारखाण्याची गाळप क्षमता वाढल्यास तालुक्यातील प्रत्येक शेतक-याच्या उसाचे निश्चित गाळप होईल ही भावना ऊस उत्पादकां मध्ये दृढ झाली असून मागिल काही दिवसा पासून ऊस उत्पादक शेतकरी किसान सभेच्या पुढाकारातून लोकशाही मार्गाने आंदोलनाचे हत्यार उपसत रस्त्यावर उतरत आहेत. याचाच एक भाग म्हणून गुरूवार ३० डिसेंबर रोजी सकाळी साडे अकरा ते अडीच असे तीनतास रास्ता रोको आंदोन किसान सभेच्या नेतृत्वात ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समिती पाथरी शहरातील सेलू कॉर्नर येथे रास्ता रोको केले. यावेळी शंभर टक्के ऊस गाळपाची हमी द्या,रेणुका शुगर्सची गाळप क्षमता प्रतीदिन दहा हजार मेट्रीक टन करा,सर्व कारखाण्यां कडील एफआरपी अदा करा,एफआरपी दरात वाढ करा,वजन काट्यातील घोळ दूर करा,सर्व कारखान्यांच्या उप उत्पादनातील नफ्याचा रेव्हेन्यू शेअरिंग फार्मुल्यानुसार अधिक लाभ उस उत्पादकांना द्या,थकीत पिक विमा अदा करा,जायकवाडी प्रकल्पाच्या कालव्यांची दुरुस्ती करा या प्रमुख मागण्यां साठी हा रास्ता रोको करण्यात आला. या वेळी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते. या वेळी राष्ट्रीय महामार्गा वरील वाहतुक खोळंबली होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या