💥या योजनेचा लाभ गरजूंना मिळावा यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार - शेख मुकरम
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) कोरोना काळात ज्या गरीब कुटुंबातील महिला विधवा झाल्या तसेच जे बालके अनाथ झाले आहेत त्यांना मदत व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाने मिशन वात्सल्य योजना सुरू केली आहे. परळी वैजनाथ तालुक्यात तहसील कार्यालयातर्फे मिशन वात्सल्य योजना समितीच्या सदस्यपदी पत्रकार शेख मुकरम यांची निवड करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ गरजूंना मिळावा यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार अशी भावना शेख मुकरम यांनी निवडीनंतर व्यक्त केली आहे.
मिशन वात्सल्य योजने अंतर्गत शासनाच्या विविध 18 योजनांचा लाभ गरजूंना मिळावा असे महाराष्ट्र शासनाचे उद्दिष्ट आहे....
0 टिप्पण्या