💥राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय ; पुढच्या २४ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज....!


💥राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला सतर्कतेचा इशारा💥

 दोन ते तीन आठवडे दडी मारल्यानंतर राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे अनेक जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस पडत आहे भारतीय हवामान विभागाच्या मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार ठाणे, पालघर, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत पुढील २४ तासांमध्ये मध्यम ते तीव्र पावसाची शक्यता आहे. 

तर मुंबईतही पुढच्या काही तासांत मुसळधार पाऊस पडेल,असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे गेल्या ३ दिवसांपासून विदर्भातही पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे गेल्या तीन आठवड्यापासून पावसाने उघडीप दिल्यानं पिक सुकू लागली होती तसेच ऊन आणि उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते मात्र वेळेवर पाऊस पडल्याने बळीराजा सुखावला आहे.

 पाऊस पडत असल्याचने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे त्यामुळे नागरिकांनाही उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे १९ ऑगस्ट, येत्या २ दिवसांत अपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा. तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया आय.एम.डी.(I.M.D.) ची वेब साईट पहा दरम्यान, महापुराचा फटका बसल्यानंतर कोकणामध्ये पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि यावेळी विदर्भ आणि मराठवाडामध्ये चांगला पाऊस होईल असा हवामान खात्याने म्हटले आहे. 

 ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट ;-

 ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट सोलापूर, सांगली, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या