💥धरणात पाणीसाठा मुबलक प्रमाणात असतांनाही अधिकारी वेळेवर पाणी सोडत नसल्याचे उभा उस सुकत आहे💥
पूर्णा (दि.१४ डिसेंबर) पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांच्या नियोजनशुन्य कारभाराचा फटका तालुक्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांना बसत असून शेतकऱ्यांचा शेतातील उभा उस अक्षरशः वाळत असून एलदरी सिध्देश्वर धरणाच्या पाण्यावर गतवर्षी १०२७ हेक्टर लागवड केलेला उस उत्पादक शेतकऱ्यांचा शेतातील उभा उस सुकुन व वाळुन जात आहे.धरणात मुबलक प्रमाणात पाणीसाठा असूनही पाटबंधारे विभागाचे अधिकारी योग्य वेळी पाणी सोडत नसल्याचे निदर्शनास येत आहे.
पुर्णा तालूक्यातील तब्बल ६०% शेतजमीन कालव्याच्या पाण्यामुळे बागायती झाली आहे मात्र धरणातील पाणी पाळीचे नियोजन रब्बीसाठी असो की उसासाठी असो त्याला पाणी ऑक्टोबर महीन्यातच मिळणे गरजेचे असतांना मात्र पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनशुन्य कारभारामुळे अद्याप पर्यंत तालुक्यात पाणी कुठेही पोहोचले नाही त्यामुळे धरणातील पाण्याच्या भरवश्यावर शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या उसाचे उत्पादन घटनार असून तालुक्यात शेतकऱ्यांचा उस पूर्णतः करपून गेल्याचे दिसत आहे .मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी पावसाळ्यात भरपूर पाऊस पडल्याने उसाची वाढ चांगली झाली असली तरी मात्र एका पाण्यामुळे उस अक्षरशः वाळून जात असल्याचे दिसत आहे.
********************************************* 💥पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचा नियोजनशुन्य कारभार उस उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीस कारणीभूत ठरतोय - माणिकराव सूर्यवंशी
********************************************
💥धरणातील पानी असूनही काही उपयोग होत नाही खर्चही फिटत नाही - ॲड कैलास पारवे प्रगतसिल शेतकरी गौर
या वर्षी कालव्यावर उस लागवड करायचा परंतु पाणी डिसेंबरमध्ये येणार लागवड तारीख उशिरा जाणार म्हणून पुढच्या वर्षी उस कोनताही कारखाना लवकर नेनार नाही म्हणून धरणातील पानी असूनही काही उपयोग होत नाही खर्चही फिटत नाही .
0 टिप्पण्या