💥शेतकऱ्यांना पिक कर्ज देण्यास टाळाटाळ; अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारा विरोधात पत्रकार प्रसाद पौळ यांनी केली तक्रार💥 पालम (दि.०९ जुलै) - तालुक्यातील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांना पीक कर्जाचे लवकर वाटप होत नाहीत याच कारणामुळे शाखा व्यवस्थापक बर्वे यांना दूरध्वनीद्वारे विचारणा केली असता संबंधित व्यवस्थापक बर्वे बातमी निगेटिव्ह लावा व मला विचारले शिवाय लावू नका असे म्हणत पत्रकारास दमदाटी
करत असल्यामुळे व शेतकऱ्यांच्या किती पीक कर्जाच्या फायली आपल्याकडे आले आहेत किती सँक्शन झाले आहेत आहेत व किती ची पडताळणी चालू आहे असे विचारल्यानंतर तू मनाला वाटेल ते छापतो का मी म्हणालो साहेब तुम्ही सांगितलं तेवढं छापतो शाखा व्यवस्थापकाच्या अशा वागण्यामुळे शेतकऱ्यांमध्ये व पत्रकारास दमदाटी करून वागणूक वागणूक देत असून अरे का रे अशा शब्दांमध्ये बोलत असून शाखा व्यवस्थापक ग्राहक व शेतकरी हा माणूस वागणूक देत असल्यामुळे तालुक्यात सर्वत्र शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होताना दिसते पत्रकार हा चौथा आधारस्तंभ असून कसल्याही प्रकारे वागणूक देण्यात येते या कारणामुळे माननीय जिल्हाधिकारी साहेब संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करून तात्काळ बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी पत्रकार सुरक्षा समिती परभणी च्या वतीने जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर परभणी यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे...
बातमीदाराने पाठवलेल्या प्रत्येक बातमीशी संपादक/संचालक सहमतच असेल असे नाही प्रत्येक बातमीची जवाबदारी बातमीदारावरच राहील बातमीदाराने जवाबदारीचे भान ठेवून वृत्तांकन करावे - संपादक
1 टिप्पण्या
याना कायद्याची भीती राहिली नाही
उत्तर द्याहटवा