💥महाराष्ट्र राज्यात आज गुरुवार दि.३० जुलै रोजी आढळले ११ हजाराच्या वर नवीन कोरोना बाधीत रुग्ण....!


💥राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याची संख्या पोहोचली अडीच लाखांवर💥
💥आज औषधोपचारा नंतर ८८६० रुग्ण बरे होऊन गेले घरी💥  
मुंबई, दि. 30 (प्रतिनिधी) : राज्यात कोरोनाचे आज ८८६० रुग्ण बरे होऊन घरे गेले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ४८ हजार ६१५ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६०.३७ टक्के आहे. आज ११,१४७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ४८  हजार १५०  रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.


आज निदान झालेले ११,१४७ नविन रुग्ण आणि नोंद झालेले २६६ मृत्यू यांचा  तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१२०८ (५३), ठाणे- २६६, ठाणे मनपा-२४२ (६),नवी मुंबई मनपा-३७३ (१०), कल्याण डोंबिवली मनपा-३५७ (६),उल्हासनगर मनपा-७२ (४), भिवंडी निजामपूर मनपा-२७ , मीरा भाईंदर मनपा-१६४ (४),पालघर-१०८, वसई-विरार मनपा-२६६ (५), रायगड-२४५ (६), पनवेल मनपा-१७१ (२), नाशिक-१७० (२), नाशिक मनपा-३१९ (७), मालेगाव मनपा-१४, अहमदनगर-२५४ (४),अहमदनगर मनपा-२१० (३), धुळे-३३, धुळे मनपा-३४ (१), जळगाव-२५६ (७), जळगाव मनपा-११९ (१), नंदूरबार-१५ (१), पुणे- ४३३ (२१), पुणे मनपा-१८८९ (५२), पिंपरी चिंचवड मनपा-९८७ (१०), सोलापूर-२२७ (५), सोलापूर मनपा-९७ (५), सातारा-२०८ (१०), कोल्हापूर-३४८ (१), कोल्हापूर मनपा-४७ (२), सांगली-८६ (२), सांगली मिरज कुपवाड मनपा-१६६ (१), सिंधुदूर्ग-२, रत्नागिरी-२५ (५), औरंगाबाद-२५२, औरंगाबाद मनपा-१६६ (६), जालना-५०, हिंगोली-१०, परभणी-६४, परभणी मनपा-४ (१), लातूर-९२ (२), लातूर मनपा-३९ (२), उस्मानाबाद-९९ (३), बीड-६१, नांदेड-७४ (७), नांदेड मनपा-७७ (४), अकोला-५३, अकोला मनपा-१३, अमरावती-२, अमरावती मनपा-१४८ (१), यवतमाळ-२८, बुलढाणा-२५ (१), वाशिम-९ (१), नागपूर-१४७ , नागपूर मनपा-१९५ (२), वर्धा-१५, भंडारा-२४, गोंदिया-१२, चंद्रपूर-१७, चंद्रपूर मनपा-५, गडचिरोली-१४, इतर राज्य १४.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २० लाख ७० हजार १२८ नमुन्यांपैकी ४ लाख ११ हजार ७९८ नमुने पॉझिटिव्ह (१९.८९ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ४ हजार १४१ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४० हजार ५४६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २६६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५८ टक्के एवढा आहे.
एकूण: बाधित रुग्ण-(४,११,७९८) बरे झालेले रुग्ण-(२,४८,६१५),मृत्यू- (१४,७२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०४),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,४८,१५०)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या