💥परभणी जिल्हावासीयांनो सावधान,कोरोना विषाणूंचा कहर अजूनही क्षमलेला नाही...?



💥जिल्ह्यातील सेलू येथील कोरोंनाबाधीत महिलेचा अखेर मृत्यू कोरोना बाधीत रुग्णात दोघांची वाढ💥

परभणी(दि.०९ जुन) - जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा कहर अद्यापही थांबला नसल्याने आता जिल्हावासीयांनी अत्यंत सतर्क होण्याची आवश्यकता निर्माण झाली असून प्रशासनाच्या निर्देशांचे नागरिकांनी काटेकोर पालन करणे बंधनकारक झाले आहे कारण सेलुतील राजीव गांधी नगरातील करोंनाबाधीत महिलेचा आज मंगळवार दि.०९ जुन रोजी मृत्यू झाल्याचे वृत्त नुकतेच हाती आले आहे. परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सूरु त्या महिलेचा असतांना मृत्यू झाला.मृत्यू झालेल्या महिलेस अन्य व्याधींही होत्या.दरम्यान जिल्ह्यात करोंनाबाधीत मृत्यूची संख्या आता तीन झाली आहे.

या घटने मुळे प्रशासनात खळबळ माजली असतांनाच आज मंगळवार दि.०९ जुन रोजी मानवत तालुक्यातील एक पुरुष वय ४४ आणि सेलू तालुक्यातील एक महिला वय ४५  यांचा स्वॕब  रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या