💥पंतप्रधान मोदींनी जम्मू-काश्मीरच्या विकासाचा प्लान बनवण्यासाठी केली मंत्रिगटाची स्थापना....!



💥केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद,थावर चंद गेहलोत,जितेंद्र सिंह,नरेंद्र तोमर आणि धर्मेंद्र प्रधान या मंत्रिगटाचे सदस्य💥


जम्मू-काश्मीरच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट तयार करण्यासाठी मोदी सरकाराने मंत्रिगटाची स्थापना केली आहे. काश्मीरचा विकास आणि तिथल्या युवकांच्या रोजगाराबद्दल मंत्रिगटाची आतापर्यंत दोनवेळा बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे. केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद, थावर चंद गेहलोत, जितेंद्र सिंह, नरेंद्र तोमर आणि धर्मेंद्र प्रधान या मंत्रिगटाचे सदस्य आहेत. इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या विकासाचा आराखडा तयार करण्याचे लक्ष्य या मंत्रिगटाला देण्यात आले आहे. रवी शंकर प्रसाद कायदा, माहिती तंत्रज्ञान मंत्री आहेत. थावर चंद गेहलोत सामाजिक न्याय, नरेंद्र तोमर कृषी मंत्री आणि धर्मेंद्र प्रधान पेट्रोलियम मंत्रीआहेत. या मंत्र्यांकडे असलेली खाती जम्मू-काश्मीरच्या विकासात कशा प्रकारचे योगदान देऊ शकतात त्याचा प्रस्ताव तयार करण्यास सांगण्यात आले आहे.३१ ऑक्टोंबरपूर्वी ही मंत्रिगट आपला अहवाल सोपवेल. मंत्रिगटाच्या अहवालानंतर काश्मीरसाठी काही खास घोषणा होऊ शकतात. काश्मीरमधल्या युवकांच्या कौशल्य विकासावर या मंत्रिगटाचा विशेषभर आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या