🌟भारताकडून दहशतवाद समर्थक पाकिस्तानच्या आर्थिक नाकेबंदीला सुरुवात ; आयात निर्यात धोरण ठप्प.......!


🌟भारताने तोडले पाकिस्तान सोबतचे व्यापारी संबंध🌟

नवी दिल्ली : जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाम मधील बैसरन येथे झालेल्या दहशतवादी कारवाई नंतर भारत सरकारने पाकिस्तान सोबत असलेले व्यापारी संबंध बंद करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे पाकिस्तानची मोठी आर्थिक नाकेबंदी होणार असल्याचे सांगितल्या जात आहे यादरम्यान दोन्ही देशातील आयात-निर्यात ठप्प झाली आहे म्हणजे भारताकडून कुठल्याही वस्तू पाकिस्तानमध्ये जाणार नाहीत व पाकिस्तानी वस्तू भारतामध्ये येणार नाहीत.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम जवळ असलेल्या बैसरन येथे २२ एप्रिल रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या दहशतवादी हल्ल्यात २८ पर्यटक मृत्यूमुखी पडले. यानंतर भारताने पाकिस्तान विरुध्द आक्रमक भूमीका घेतली आहे. हा हल्ला झाल्यानंतर लगेचच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी तातडीने जम्मू-काश्मीर गाठून घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी या हल्ल्यात मरण पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. तसेच जखमींची विचारपूस केली होती. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला परदेश दौरा अर्ध्यावर सोडून मायदेशी परतले होते. लगेचच त्यांनी दिल्लीत उच्चस्तरीय बैठकांचा सपाटा लावला होता. या बैठकांमध्ये पाकिस्तानची कोंडी करण्यापासून ते दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यापर्यंतच्या विषयांवर विविध निर्णय घेण्यात आले. सर्वप्रथम पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्याचे आदेश दिले गेले. त्याचसोबत पाकिस्तान सोबत असलेला सिंधू जलकरार प्रथमच स्थगित करण्यात आला. सीमेवर भारताने हालचाली वाढविल्या नुकतेच वायु दलाच्या कसरती घेण्यात आल्या. त्यामुळे पाकिस्तानमध्ये दहशत निर्माण झाली आहे. काल रात्री झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत पाकिस्तानची अर्थव्यवस्था मोडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. भारताने पाकिस्तानसोबतचा सर्व प्रकारचा व्यापार बंद केला आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या आयात-निर्यात व्यापारावर बंदी घातली आहे. याची माहिती परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने निर्देश जारी केले आहेत. भारताने राष्ट्रीय सुरक्षा अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे या सुचनेत म्हटले आहे. भारताने पहालगाम हल्ल्याचा बदल घेण्यासाठी अनेक मोठे निर्णय घेतले जात आहेत. काल भारतीय वायु दलाने उत्तर प्रदेशच्या गंगा एक्सप्रेस वे वर फ्लाईपास्ट केले. शाहजहापुरच्या साडे तीन किमीच्या मार्गावर लढाऊन विमानांनी टेक ऑफ आणि लँडींगचा सराव केला आहे. भारतीय वायुसेनेचे राफेल, मिराज आणि जग्वार या लढाऊ विमानांनी अवकाशात सराव केला. हा सराव पाहून अनेकांना युद्ध सुरू झाले की काय असे वाटत होते.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या