🌟परभणी शहरातील कृषीनगर येथे नागरी सुविधा द्या.....!


🌟प्रहार जनशक्ती पक्षाची मनपा आयुक्ताकडे निवेदनाद्वारे मागणी🌟

परभणी - परभणी महानगरपालिका हद्दीमध्ये असलेल्या १५ ते २० वर्षे जुन्या कृषी नगर येथे नागरी सुविधा तात्काळ उपलब्ध करून देणे बाबत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने व कृषी नगर भागातील नागरिकांच्या वतीने आज महानगर पालिका आयुक्त यांना एक निवेदन देण्यात आले. मनपा आयुक्त उपलब्ध नसल्याने त्यांच्या वतीने मनपा उपायुक्त श्री तडवी यांनी निवेदन स्वीकारले.


मनपा हद्दीत असलेल्या सगळ्या जुन्या कृषी नगर भागामध्ये महानगरपालिकेच्या वतीने अद्यापही रस्ते व गटाराचे बांधकाम करण्यात आलेले नाही शिवाय या भागांमधून जात असलेल्या नाल्यावर पूल नसल्याने येथील नागरिकांना वाहतुकीसाठी त्रास होतो शिवाय पावसाळ्यामध्ये नाल्याचे पाणी परिसरातील नागरिकांच्या घरामध्ये शिरते याबाबत अनेकदा तक्रार करूनही महानगरपालिकेच्या वतीने अद्यापही कुठल्याही प्रकारचे कारवाई करण्यात आली नाही. तीन वर्षांपूर्वी प्रहार जनशक्ती पक्षाच्या पाठपुराव्यामुळे महानगरपालिकेच्या वतीने या नाल्यावर पाईप टाकून तात्पुरता रस्ता करण्यात आला होता परंतु तो पण वाहून गेला आहे.

या भागातील रहिवासी नियमितपणे घरपट्टी भरत असतानाही मनपाच्या वतीने नागरी सुविधा उपलब्ध होत नाहीत हे दुर्दैवाची बाब आहे निवेदन घेण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळाला उपायुक्त श्री तडवी यांनी तात्काळ या भागाचे सर्वेक्षण करून या भागांमध्ये नागरी सुविधा कशा पुरवल्या जातील यासाठी प्रयत्न केला जाईल अशी हमी दिली निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, धर्मेंद्र तूपसमुद्रे, रवी सोनाळे, कृष्णा शिवभगत, वैजनाथ जाधव, महेंद्र तूपसमुद्रे, पंढरीनाथ जाधव, सुभानभाई, रघुनाथ खेलवडे, रमेश जाधव, गजानन कोठुळे, चंद्रकांत कदम इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या