🌟भारतातील जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाम दहशतवादी हल्ला दहशतवाद समर्थक पाकिस्तानच्या अंगलट🌟
दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला. दोन्ही देशांकडून युद्धाची तयारी सुरू करण्यात आली. त्यामुळे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने सोमवारी बंद दाराआड चर्चा आयोजित केली. पाकिस्तानने या तणावावर तातडीची बैठक बोलावण्याची मागणी केली होती,तर भारताने सीमेपलीकडील दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. यूएनमध्ये भारताला १५ पैकी १३ सदस्य देशांनी पाठिंबा दिला.
आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या विरोधी वातावरण तयार होत असल्याचे पाहून पाकिस्तानने थेट संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेकडे धाव घेतली. या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलावण्याची विनंतीही केली. पाकिस्तानच्या विनंतीवर बैठक आयोजित करण्यात आली, पण यात पाकिस्तानलाच अनेकांनी सुनावले.
न्यूयॉर्कमधील सूत्रांच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या बैठकीत सर्व सदस्यांनी पाकिस्तानला पहलगाम हल्ला व त्यानंतरची आततायीपणाची पावले यावरून खडे बोल सुनावले. मंगळवारी सकाळी झालेल्या या बैठकीत पाकिस्तानला पहलगाम हल्ल्यासंदर्भात कठोर प्रश्न विचारण्यात आले. पाकिस्तानकडून भारताला दोष देण्याचे अपयशी प्रयत्न बैठकीत इतर सदस्यांवर पुरेसा प्रभाव पाडू शकले नाहीत.....
0 टिप्पण्या