🌟प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पहिल्यांदा यादीवर आले आहे🌟
मुंबई :- महाराष्ट् राज्यातील राजकीय क्षेत्रात मागील तीन वर्षांपूर्वी मोठी उलथापालथ झाली शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी जून २०२२ मध्ये पक्षांतर्गत बंडखोरी करीत त्यांनी स्वतंत्र गट स्थापन करत आपलीच शिवसेना खरी असल्याचा दावा केला होता. त्यानंतर वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली. अजित पवार यांनी शरद पवार यांच्याविरोधात बंड पुकारत राष्ट्रवादी पक्षावर दावा केला होता.
निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूने पक्ष आणि चिन्हाबाबत निकाल दिला. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांच्या नेत्यांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेले. आता दीड वर्षांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील पक्ष-चिन्हाबाबत सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात दीड वर्षानंतर शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि नाव या याचिकेवर सुनावणी होणार आहे. सप्टेंबर २०२३ नंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पहिल्यांदा यादीवर आले आहे त्यामुळे या प्रकरणावर आता ७ मे रोजी सुनावणी होणार आहे.
0 टिप्पण्या