🌟वक्फच्या ६० टक्के जमिनीवर अतिक्रमण अतिक्रमित मालमत्ता धारकांची नावे जाहीर करा....!


🌟'वक्फ' मालमत्तांचे 'जीआय एस मॅपिंग' करा : रईस शेख यांचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र🌟


मुंबई
: महाराष्ट्र राज्यात वक्फ बोर्डाकडे ३७ हजार ३३० हेक्टर जमीन असून त्यापैकी ६० टक्के जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. यामुळे मुस्लिम समुदायाला कब्रस्तानासाठी वणवण भटकावे लागते. त्यामुळे वक्फच्या जमीनीवरील अतिक्रमित मालमत्ता धारकांची नावे जाहीर करण्यात यावी व वक्फच्या मालमत्तेचे जीआय एस मॅपिंग करण्यात यावे असे समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, अल्पसंख्याक मंत्री दत्तात्रय भरणे, वक्फ मंडळाचे अध्यक्ष समीर काझी यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

'वक्फ'च्या राज्यात तब्बल २३ हजार ५६६ मालमत्ता असून त्याअंतर्गत ३७ हजार ३३० हेक्टर जमीन आहे. मात्र 'वक्फ'च्या ६० टक्के जमिनीवर अतिक्रमण आहे. 'वक्फ'च्या जमिनी पूर्ववत करण्यासाठी मंडळाने एक कृतिदल स्थापन केले होते. मात्र हे दल केवळ २१ मालमत्ता अतिक्रमणाच्या विळख्यातून वाचवू शकले आहे. १९९७ मध्ये महसूल व वन विभागाने 'वक्फ' मालमत्तांचे सर्वेक्षण केले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या