🌟पंजाबमधील आप सरकारने भाक्रा धरणातून बिनशर्त पाणी सोडावे.....!

 


🌟हरयाणाचे मुख्यमंत्री नायाबसिंग सैनी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत मागणी🌟

चंदिगड : पंजाब आणि हरयाणातील पाणीसंघर्ष शनिवारी अधिकच पेटला. हरयाणामध्ये शनिवारी एका सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये पंजाबमधील आप सरकारने भाक्रा धरणातून बिनशर्त पाणी सोडावे, असे आवाहन करण्यात आले. 

भाजपशासित हरयाणाला अधिकचे पाणी देण्यास पंजाबमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोध करण्यात आल्यानंतर हरयाणामध्ये सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. हरयाणाचे मुख्यमंत्री नायाबसिंग सैनी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत, पंजाब सरकारचे हे पाऊल असंवैधानिक, बेकायदेशीर, अमानवी आणि अयोग्य असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. भाक्रा बियास व्यवस्थापन मंडळाच्या तांत्रिक समितीने अलीकडेच घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, असे पंजाब सरकारला सांगण्यात आले. या प्रश्नावर हरयाणातील सर्व पक्ष एकवटले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या