🌟केंद्र सरकारच्या एक राज्य, एक ग्रामीण बँक धोरणांतर्गत या बँकांचे इतर बँकांमध्ये विलीनीकरण🌟
मुंबई :- देशातील अनेक ग्रामीण बँका आज गुरुवार दि.१ मे पासून बंद होत आहेत केंद्र सरकारच्या एक राज्य, एक ग्रामीण बँक धोरणांतर्गत, या बँकांचे इतर बँकांमध्ये विलीनीकरण केले जाईल. यामुळे देशातील ग्रामीण बँकांची संख्या ४३ वरून २८ पर्यंत कमी होईल. सरकारने हा निर्णय घेण्यामागील कारण म्हणजे बँकिंग सेवा मजबूत करणे आणि त्या अधिक प्रभावी करणे. जर तुमचे अशा बँकेत खाते असेल तर तुमच्या पैशांचं काय होणार? असा प्रश्न तुमच्या मनात येणे साहजिक आहे. चला जाणून घेऊया. सरकारच्या या निर्णयाचा परिणाम तुम्हाला ११ राज्यांमध्ये दिसून येईल. ज्यामध्ये आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, गुजरात, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक आणि मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा आणि राजस्थान यांचा समावेश आहे. या राज्यांमधील सर्व ग्रामीण बँकांचे विलीनीकरण करून त्या राज्यात एक ग्रामीण बँक तयार केली जाईल.
0 टिप्पण्या