🌟भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग : गृह विभागाकडून गाईडलाईन्स जारी....!

 


💥पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर भारताच्या १५ शहरांवर हल्ला करण्याचा केला प्रयत्न💥

जयपूर - भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर भारताच्या १५ शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारताने पाकिस्तानता हल्ला हाणून पाडला. यानंतर भारताने पाकिस्तानच्या १२ शहरांमध्ये ५० ड्रोन हल्ले केल्याची माहिती आहे. या घडामोडींनंतर आता केंद्र सरकार आणि राजस्थान सरकार देखील सतर्क झालं आहे. राजस्थान सरकारच्या गृह विभागाने एक सूचना जारी केली आहे. यात राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाकिस्तानी हल्ल्याला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत काय तयारी करायची, याबाबत गाईडलाईन्स जारी करण्यात आले आहेत.

गृह विभागाने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा तयार ठेवण्यास सांगितले आहे. गृह विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार, शत्रू देशाने हल्ला केल्यास रुग्णालयांमध्ये जीवनावश्यक औषधे उपलब्ध ठेवावे असे सांगण्यात आले आहे. तसेच, रक्तपेढ्यांमध्ये सर्व रक्तगटाचे रक्त पुरेसे असावे, असं सांगण्यात आलं आहे. तसेच रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची उपस्थिती राहायला हवी. तात्पुरती निवारा केंद्रे म्हणून निवडलेल्या इमारतींमध्ये जनरेटरची व्यवस्था करावी, असे गृह मंत्रालयाने आदेशात म्हटलं आहे. या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये काही महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आलं आहे. देशाविरोधात भडकाऊ पोस्ट टाकणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील वातावरण बिघडणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यांमध्ये पुरेसा अन्नसाठा ठेवावा. लोकांनी अनावश्यक साठा करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या