🌟ऑपरेशन सिंदूर कारवाई नंतर बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा....!


🌟संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डयांवर सुरु केलेल्या कारवाईची माहिती सर्वपक्षीय नेत्यांना दिली🌟

नवी दिल्ली :  भारत सरकारच्यावतीने सुरु असलेल्या पाकिस्तानी दहशतवादी कारवायांचे आज गुरुवार दि.०८ मे २०२५ रोजी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत देशातील सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार समर्थन करीत शासनाला संपुर्ण पाठिंबा व्यक्त केला आहे.

ऑपरेशन सिंदूर नंतर केंद्र सरकारच्यावतीने आज सकाळी पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यापूर्वी पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. ऑपरेशन सिंदूर नंतर आज आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डयांवर सुरु असलेल्या कारवाईची माहिती सर्वपक्षीय नेत्यांना दिली. या बैठकीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पाकिस्तानी दहशतवादा विरुध्द केंद्र सरकार करत असलेल्या सर्व कारवायांना आमचा पाठिंबा असल्याचे सांगितले. तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ही एकतेची वेळ आहे. आम्ही सर्वजण एकजूटीने सरकारच्या पाठिशी खंबीर असल्याचे सांगितले. तर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही केंद्र सरकारच्या कारवायांना पाठिंबा व्यक्त केला आहे. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी ही कारवाई अत्यंत संवेदनशील विषय आहे. त्यामुळे स्वतंत्रपणे कोणतीही माहिती देता येणार नाही. पाकिस्तानी दहशतवादाविरुध्द आपली कारवाई सुरुच असल्याचे सांगून विरोधकांनी भारत एक परिपक्व लोकशाही देश असल्याचे दाखवून दिले असे त्यांनी सांगितले. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा, अर्थमंत्री निर्मला सीतारमण हे सत्ताधारी पक्षाकडून तर विरोधकांकडून विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे, शिवसेनेचे खा. संजय राऊत, प्रफुल्ल पटेल, संबित पात्रा, संजय सिंह,संजय झा, प्रेमचंद्र गुप्ता, जॉन ब्रिटास आदी उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या