🌟दिल्ली न्यायालयाच्या या निर्णयामुळे सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ🌟
नवी दिल्ली :- नेशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने काँग्रेस पक्षाच्या नेत्या तथा माजी अध्यक्षा सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांना अखेर नोटीस बजावली आहे. यापूर्वी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने नोटीस बजावण्यास नकार दिला होता. दिल्ली न्यायालयाच्या या निर्णयामुळे सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे सांगितल्या जात आहे.
नेशनल हेराल्ड प्रकरणी माजी खा. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी मनी लॉन्ड्रिंग झाल्याचे आरोप केले होते. याप्रकरणी त्यांनी दिल्लीतील राऊस अव्हेन्यू न्यायालयात खटला देखील दाखल केला होता. याच प्रकरणात ईडीकडून देखील चौकशी झाली होती. ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाने काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, खा. राहुल गांधी, तसेच इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा यांच्यासह इतर काही वरिष्ठ नेत्यांविरुद्ध राऊज अव्हेन्यू कोर्टात चार्जशीट दाखल केली होती. यापूर्वी २५ एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत कोर्टाने नोटिस जारी करण्यास नकार दिला होता. आजच्या सुनावणीत कोर्टाने सोनिया आणि राहुल गांधी यांना नोटिस जारी केली आहे. या प्रकरणात पुढील सुनावणी ८ मे रोजी होणार आहे. दिल्लीतील कोर्टाने नोटिस बजावल्यामुळे राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी दाखल केलेल्या याचिकेत काँग्रेस नेत्यांवर आर्थिक फसवणूक आणि सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. हे प्रकरण मुख्यतः यंग इंडियन लिमिटेड आणि असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड या दोन कँप्रन्यांशी संबंधित आहे. स्वतंत्रपूर्व काळात एजेएल ही कंपनी नेशनल हेराल्ड या वृत्तपत्राचं प्रकाशन करत होती.
ही संस्था १९३८ मध्ये पंडित नेहरू आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांनी सुरू केली होती. मात्र काळानुसार हे वृत्तपत्र बंद पडलं आणि एजेएलवर मोठं कर्ज झालं. २०११ मध्ये काँग्रेस पक्षाने ही जबाबदारी आपल्या खिशातून ९० कोटी रुपये देऊन घेतली होती. काँग्रेसकडून वायआयएल ही कँमनी स्थापन करण्यात आली. या कँमनीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे प्रत्येकी ३८% हिस्सा आहे. ईडीच्या तपासानुसार, काँग्रेसने दिलेलं ९० कोटींचं कर्ज माफ करून त्या मोबदल्यात वायआयएल ला एजेएलचे ९ कोटी शेअर्स ट्रान्सफर केले. त्यामुळे एजेएल वर वायआयएल ला ९९% स्वामित्व मिळालं. महत्त्वाचं म्हणजे, एजेएल कडे संपूर्ण देशभरात सुमारे २,००० कोटी रुपयांच्या मालमत्ता आहेत. म्हणजेच वायआयएलने अत्यल्प रकमेच्या मोबदल्यात इतकी मोठी मालमत्ता मिळवली, असा ईडीचा आरोप आहे.....
0 टिप्पण्या