🌟'ऑपरेशन सिंदूर' कारवाईमुळे पाकिस्तानचा थरकाप : पाकिस्तानने ३६ ठिकाणी डागले ४०० ड्रोन.....!


🌟भारताने सर्व ड्रोन पाडून पाकिस्तानला दिली मोठी चपराक : परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांची माहिती💥


नवी दिल्ली :
'ऑपरेशन सिंदूर' मध्ये भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले केले या हल्ल्यांनी तंतरलेल्या पाकिस्तानने गुरुवारी रात्री भारताच्या सैन्य तळांवर हल्ले केले. लेहपासून सर क्रीकपर्यंत ३६ ठिकाणी पाकिस्तानने ४०० ड्रोन डागले. हे सर्व ड्रोन भारताने पाडून पाकिस्तानला मोठी चपराक लगावली भारताची हवाई हद्द ओलांडण्याची गंभीर कृतीही पाकिस्तानने केली अशी माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी दिली.

'ऑपरेशन सिंदूर'च्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी, कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी तिसऱ्यांदा पत्रकार परिषद घेतली. या तिघांनी ८ व ९ मे रोजी पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यांची माहिती दिली. कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले की, ८ मेच्या रात्री व ९ मेच्या पहाटे पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्यतळांवर अनेक वेळा हल्ले केले. तसेच आंतरराष्ट्रीय सीमेवर ३६ ठिकाणी घुसखोरीचा प्रयत्न केला. त्यासाठी जोरदार गोळीबार करण्यात आला. भारताने सर्व घुसखोरांना ठार केले आहे.

भारताने गुरुवारी रात्री पाकिस्तानने केलेले सर्व हल्ले निकामी केले. भारताच्या 'एस-४००' हवाई संरक्षण यंत्रणेने हे सर्व क्षेपणास्त्र व ड्रोन्स पाडले तर 'एएनआय'ने सूत्रांच्या हवाल्यावरून सांगितले की, 'एस-४००' ने पठाणकोटमध्ये पाकिस्तानचे एक लढाऊ विमानही पाडले आहे. मात्र त्याची अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री म्हणाले की, पाकिस्तानने काल रात्री भारताला डिवचणारी कारवाई केली. त्यांची कृती पळपुटेपणाची होती. त्यांनी भारतीय शहरे, नागरी सुविधा व काही लष्करी आस्थापनांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. भारतीय सैन्याने त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानने पूँछमध्ये गुरुद्वारावर हल्ला केला. या हल्ल्याची जबाबदारी घेण्याऐवजी त्याचा दोष भारतीय लष्करावर टाकला जात आहे. पाकिस्तान आपण हल्ला करत असल्याचे मान्य करत नाही. तसेच तो जगाला फसवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप मिस्त्री यांनी केला.

💫ननकाना साहीब गुरुद्वारावरील हल्ल्याबाबत पाकचा उलटा कांगावा :-

ननकाना साहिबवर भारताने ड्रोन हल्ला केल्याचा आरोप पाकिस्तान करत आहे या प्रकरणाला धार्मिक रंग दिला जावा, असाच पाकचा प्रयत्न आहे. पहलगाम हल्ल्यातही हेच दिसून आले होते. गुरुद्वारावर केलेल्या हल्ल्यात काही शीख कुटुंबांचा मृत्यू झाला आहे. भारतच आपल्या शहरांवर हल्ला करत आहे, असा कांगावा पाकिस्तान करत आहे. मात्र, ही केवळ कल्पना आहे असे मिस्री म्हणाले करतारपुर साहिब कॉरिडॉर सेवा अनिश्चित काळासाठी स्थगित केली आहे असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.

💫तुर्कीयेच्या ड्रोनचा वापर :-

पाकिस्तानने तुर्कयिच्या ड्रोनचा वापर केला. याचा उद्देश गुप्त माहिती गोळा करणे व हवाई संरक्षण यंत्रणेची माहिती घेणे होय. याची चौकशी केली जात आहे. या ड्रोनना निष्क्रीय करण्यात आले आहे.

💫जीवनावश्यक वस्तूंच्या साठेबाजीवर कारवाई करणार :-

जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या घाऊक दुकानदार व व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा सरकारने शुक्रवारी दिला. भारत-पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा इशारा सरकारने दिला. केंद्रीय अन्न व ग्राहकमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोशल मीडियावर सांगितले की, भारताकडे पुरेसा अन्नधान्याचा साठा आहे. त्यामुळे अन्नाचा साठा करून ठेवा, आदी संदेशावर विश्वास ठेवू नका.

💫'एस-४००', 'बराक-८' व 'आकाश'चा वापर :-

पाकिस्तानने केलेले हल्ले भारताच्या 'एस-४००', 'बराक-८' व 'आकाश' क्षेपणास्त्राने परतवून लावले, अशी माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली भारताने 'ऑपरेशन सिंदूर' मोहीम सुरू केली. त्यानंतर पाकिस्तानने भारतीय लष्करी आस्थापनांवर हल्ले करून तणावात भर टाकली भारताने प्रत्येक क्षेपणास्त्र पाडले.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या