🌟परभणी तालुक्यातील पिंपरी देशमुख येथे वादळी वार्‍यामुळे फळवर्गीय पिकाचे अतोनात नुकसान.....!


🌟शेतकरी विद्याधर संघई यांच्या फळबागाचे लाखोचे नुकसान🌟

परभणी (दि.०७ मे २०२५) - परभणी तालुक्यातील पिंपरी देशमुख येथे सततच्या दोन दिवसाच्या वादळी वार्‍यामुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले. सोमवारी सायंकाळी  व मंगळवारी सायंकाळी सतत दोन दिवस सोसाट्याने वादळी वारे  सुटल्याने विद्याधर गुलाबचंद संघई यांच्या आंबा फळबागेचे आतोनात नुकसान झाले आहे. व इतर केळीबागा,जांभुळ विविध फळपिके यांची खूप नासाडी झाली. तरी शेतकरी हवालदिल झाला आहे. कारण सतत दोन वर्षापासून सोयबीन पिकाचे भाव पडलेले आहेत. ४ हजारापेक्षा जास्त भाव येत नाही. आणि त्यातच निसर्गाचा कोप झाल्याने शेतकरी खचून गेले आहे. याकडे शासनाने लक्ष देऊन रिसतर पंचनामे करून त्यांना अधिकची मदत देण्याची गरज आहे, असे दै. सामनाशी बोलताना सांगीतले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या