🌟पाकिस्तानी दहशतवादा विरोधातील 'ऑपरेशन सिंदूर' अद्याप संपलेले नाही - संरक्षणमंत्री राजनाथसिंह


🌟सर्व पक्षांनी ऑपरेशन सिंदूरसाठी एकमताने लष्कराचे अभिनंदन केले आणि एकत्रित पाठिंबा दर्शविला आहे🌟

नवी दिल्ली :- भारतातील जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाम येथील पर्यटकांवर पाकपुरस्कृत राक्षसी प्रवृत्तीच्या धर्मांध दहशतवाद्यांनी केलेल्या अमानुष गोळीबारात २८ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर भारताने दहशतवादी पाकिस्तान विरोधात 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली सदरील 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत कारवाई अजूनही सुरू आहे बुधवारी रात्री पाकिस्तानातील दहशतवादी कॅम्पवर ९ ठिकाणी झालेल्या हवाई हल्ल्यानंतरही कारवाई अद्याप थांबलेली नाही असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीतील संसदेच्या कक्षात बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, “ऑपरेशन सिंदूरबाबत सर्व नेत्यांनी एकता दाखवली आहे. आम्ही सरकार आणि सैन्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे सर्वपक्षीय नेत्यांकडून यावेळी सांगण्यात आले. बैठकीत काही नेत्यांकडून महत्त्वाच्या सूचना मिळाल्या आहेत, ज्या सरकार गांभीर्याने घेईल. सर्व पक्षांनी ऑपरेशन सिंदूरसाठी एकमताने लष्कराचे अभिनंदन केले आणि एकत्रित पाठिंबा दर्शविला आहे. तर, ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही. हे दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेले 'ऑन गोइंग ऑपरेशन' आहे."

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या