🌟महाराष्ट्र राज्यातील सत्ताधारी भाजप महायुतीच्या सत्ताकाळात राज्यात सर्वत्र गुन्हेगारीने नवा उच्चांक गाठला...!


🌟राष्ट्रवादी काँग्रेस ही गुंडांची टोळी : कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा महायुती सरकारवर हल्लाबोल🌟

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील सत्ताधारी भाजप महायुतीच्या सत्ताकाळात राज्यात सर्वत्र गुन्हेगारीने नवा उच्चांक गाठला आहे. बहुतांश गुन्हेगारी घटनांतील आरोपी हे सत्ताधारी पक्षाशी संबंधित असून त्यांना सरकारचे अभय असल्याचे वारंवार दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात घडलेल्या विविध गुन्हेगारी कृत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पक्षाशी संबंधित लोकांचा मोठा सहभाग दिसून आला आहे, हे अत्यंत गंभीर असून राष्ट्रवादी काँग्रेस ही गुंडांची टोळी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे या टोळीचे आका आहेत का? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

गांधीभवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, बीडच्या मस्साजोगच्या घटनेतील आरोपी, पुण्याच्या पोर्शे कार ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह प्रकरणातील आरोपी, कोयता गँग, शेल्टर होमच्या नावाखाली तरुणींवर लैंगिक अत्याचार करणारा शंतनू कुकडे, त्याचा सहकारी राष्ट्रवादीचा मानकर आणि वैष्णवी हगवणे या भगिनीचा हुंड्यासाठी छळ करून तिचा जीव घेणारे राजेंद्र हगवणे हे सर्व आरोपी राष्ट्रवादीशी संबंधित आहेत. या सगळ्या प्रकरणातले आरोपी अजित पवारांच्या पक्षातलेच कसे? असा संतप्त सवाल करून या सगळ्या गुंडांचे पालकत्व सत्ताधाऱ्यांनी घेतले आहे, त्यामुळे अशी घृणास्पद कृत्ये करण्याची यांची हिंमत होते का? या संपूर्ण प्रकरणात राज्य महिला आयोगाचा असंवेदनशीलपणा पुन्हा दिसून आला आहे. महिला आयोगाने वेळीच दखल घेतली असती तर एक निष्पाप जीव वाचला असता, असे सपकाळ म्हणाले.

💫अशा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करा :-

राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. हजारो लाखो हेक्टरवरील पिके आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. पण सरकारकडून मदत देणे दूरच साधे पंचनामेही केले जात नाहीत. दुसरीकडे खरीप हंगाम तोंडावर आला आहे. बोगस बियाणे आणि खतांचा राज्यात सुळसुळाट झाला आहे. बियाणे आणि खतांची लिंकींग करून विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक आणि फसवणूक केली जात आहे. अशा विक्रेत्यांवर सरकारने तत्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी केली.

💫विधिमंडळाच्या अंदाजपत्रकीय समितीचे प्रमुख अर्जुन खोतकर व त्यांच्या पीएला अटक करा :-

राज्यातले महायुतीचे सरकार हे भ्रष्टाराच्या पायावर उभे असून या सरकारमधील सहभागी मंत्री, आमदारांकडून फक्त लूट सुरू आहे. धुळ्याच्या दौऱ्यावर असलेल्या विधिमंडळाच्या अंदाजपत्रकीय समितीचे प्रमुख अर्जुन खोतकर यांच्या पीएच्या खोलीत जवळपास दोन कोटी रुपयांची रक्कम सापडली. हा या सरकारच्या लुटीचा भक्कम पुरावा आहे. धुळे भागातील कंत्राटदारांकडून ही रक्कम उकळल्याची चर्चा आहे. आमदाराच्या पीएकडे एवढी मोठी रक्कम सापडली आहे तर आमदाराकडे किती रक्कम असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा या भ्रष्टाचाराला पाठिंबा नसेल तर त्यांनी खोतकर व त्यांच्या पीएवर गुन्ह दाखल करून त्यांना तत्काळ अटक करावी. तसेच शिंदेंच्या सर्व आमदारांची लाचलुचपत विभाग, ईडी व इन्कम टॅक्सकडून चौकशी करावी, अशी मागणी सपकाळ यांनी केली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या