🌟खंडीत नालीचा नैसर्गिक प्रवाह पुढील नालीस जोडण्यास टाळाटाळ : परिसरात साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात🌟
परभणी (दि.०९ मे २०२५) :- परभणी महानगर पालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाच्या निष्क्रिय निर्दैयी कारभारामुळे शहरातील गुलशनाबाग परिसरातील नागरिकांना अक्षरशः नरकयातना सोसाव्या लागत असून गुलशनाबाग परिसरातील यशवंत कॉलेज समोरील मोठा मारोती लगत असलेल्या मोठ्या सिसी नालीचे बांधकाम महानगर पालिकातर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाकडून हाती घेण्यात आले खरे परंतु सदरील नालीचे बांधकाम अर्धवट सोडण्यात आले व या खंडीत नालीचा नैसर्गिक प्रवाह पुढील नालीस जोडण्यात न आल्यामुळे या नालीतून वाहणाऱ्या सांडपाण्यासह संडासच्या आऊटलेटचे गलिच्छ पाणी मोठ्या प्रमाणात नालीत साचून रस्त्यावर येत असल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी तर सुटतच आहे याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे या गलिच्छ पाण्यामुळे डासांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत असल्याने परिसरातील नागरिकांना विविध जिवघेण्या आजारांना सामोरे जावे लागत आहे या संदर्भात परिसरातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी परभणी महानगर पालिका आयुक्तांना दि.२८ ऑगस्ट २०१४ व दि.११ एप्रिल २०२५ व दि.३० एप्रिल २०२५ असे तीन वेळा लेखी स्वरूपात तक्रार अर्ज देऊन देखील महानगर पालिका आयुक्तांसह महानगर पालिका प्रशासनाने त्यांच्या अर्जाची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नसल्याने यावरुन महानगर पालिका आयुक्त व मनपा प्रशासनाचा निष्क्रिय व निर्दैयी कारभार उजागर होत असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
परभणी महानगर पालिका आयुक्तांसह सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता यांना देखील गुलशनाबाग परिसरातील मोठा मारोती जवळपास राहणाऱ्या नागरिकांनी दि.३० मे २०२५ रोजी दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की गुलशना बाग परिसरातील यशवंत कॉलेज समोरील मोठा मारोती जवळ आमच्या घरासमोरील सिसी नालीचे नवीन बांधकाम चालू आहे नाली तयार करत असतांना नालीचा नैसर्गिक प्रवाह पश्चिमेकडे करण्यात आला आहे. नैसर्गिक प्रवाहा नुसार ही नाली पश्चिमेच्या रस्त्याच्या बाजुला जोडणे आवश्यक होते परंतु एका व्यक्तीच्या फोन संदेशावरून सदरील नालीचे जोडणीचे काम थांबवुन पूर्वेकडील नाली तेथेच बंद करण्याचा घाट घातला यामुळे नालीचा नैसर्गिक प्रवाह खंडीत झाला आहे नालीची जोडणी न केल्यामुळे पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही यामुळे खंडीत झालेल्या नालीत काम न झाल्यामुळे त्या भागात पाणी साचुन परिसरामध्ये दुर्गंधी पसरली आहे. पाण्यामध्ये बऱ्याच प्रमाणात अळ्या व जंतुंसह डासांचे प्रमाण देखील वाढत असून डासांची उत्पत्ती होऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी वरील बाबींकडे मनपा आयुक्त साहेबांनी तात्काळ लक्ष देऊन नालीचा खंडीत झालेला प्रवाह सुरळीत करावा. नालीत साचलेले पाणी प्रवाहीत करावे ही अशी विनंती देखील निवेदनात करण्यात आली आहे परंतु महानगर पालिका आयुक्तांनी अद्यापही निवेदनाची दखल घेतली नसल्याचे निदर्शनास येत असून महानगर पालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासन कोणाच्या अंतर्गत दबावाखाली येऊन या परिसरातील नालीचे बांधकाम अर्धवट सोडून परिसरातील नागरिकांच्या आरोग्याशी जिवघेणा खेळ खेळत आहे याची सखोल चौकशी माननीय जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी करावी व परिसरातील नागरिकांना पावसाळा लागण्यापूर्वी योग्य न्याय द्यावा अशी मागणी जनसामान्यांतून होत असून या निवेदनाची एक प्रत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना देखील देण्यात आली आहे या निवेदनावर परिसरातील प्रतिष्ठित नागरिक दत्ता नरहीरे यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत......
0 टिप्पण्या