🌟भारताचे सरन्यायाधीश भुषण गवई आंबेडकरी विचारांचे असल्यानेच महाराष्ट्रात त्यांचा अपमान....!


🌟काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नाना पटोले यांचा गंभीर आरोप🌟

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भारताचे सन्माननीय सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतल्यानंतर ते प्रथमच मुंबईत आले असता राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉल पाळला नाही या घटने संदर्भात प्रतिक्रिया देतांना कॉंग्रेस पक्षाचे नेते नाना पटोले यांनी म्हटले की सरन्यायाधीश भुषण गवई हे आंबेडकरी असल्यानेच त्यांचा महाराष्ट्रात अपमान केला गेला असा आरोप केला आहे.

पटोले म्हणाले की, महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई सरन्यायाधीश झाल्याने अख्ख्या महाराष्ट्राला त्यांचा अभिमान आहे. मात्र आपल्याच सुपुत्राचा अपमान राज्यातील युती सरकार व अधिकाऱ्यांनी केला आहे. सरन्याधीशांसाठी असलेला प्रोटोकॉल न पाळून त्यांचा अपमान केला. सर न्यायाधीशांचा प्रोटोकॉल न पाळून अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सरकार काय कारवाई करणार आहे पटोले म्हणाले की, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभेचे अध्यक्ष सरन्यायाधीश, यांचा एक विशेष प्रोटोकॉल असतो. त्यांच्या दौऱ्याची माहिती आधीच दिलेली असते. सर न्यायाधीशांचा प्रोटोकॉल न पाळून युती सरकारने महाराष्ट्राची अब्रू वेशीवर टांगली आहे.

छत्रपती शाहू महाराज,महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यातून एक आंबेडकरी विचाराची व्यक्ती सरन्यायाधीश झाली त्याचा आनंद आहे सरकारमध्ये अनुभवी मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री आहेत त्यांनाही याचे गांभीर्य नाही का, असेही नाना पटोले म्हणाले.

💫राज्य सरकारने महान समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले चित्रपट टॅक्स फ्री करावा - नाना पटोले 

राज्य सरकार सर्वधर्म समभाव मानत असेल तर महान समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावरील फुले चित्रपट राज्यात टॅक्स फ्री करावा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. या आधी सरकारने राज्यात अनेक चित्रपट टॅक्स फ्री केले आहेत, मात्र फुले यांच्या जीवनावरील चित्रपटाबाबत वेगळी भूमिका का, असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या